शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
2
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
3
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
4
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
6
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
7
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
8
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
9
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
10
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
11
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
12
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
13
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
14
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
15
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
16
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
17
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
19
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
20
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'

कचरा संकलनासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा : मनपा नवा पॅटर्न राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:05 IST

स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देवॉकीटॉकीचा वापर केला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ व सुंदर शहारासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरोग्य विभागाची स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम केली जाणार आहे. घराघरातील कचरा विलगीकरण करून संकलित झाला तर स्वच्छतेची समस्याच राहणार नाही. याचा विचार करता आगामी मार्च महिन्यापासून शहराला दोन भागात विभाजित करून संकलनासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसविली जाणार आहे. नियंत्रण कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. कचरा संकलनाचा नवा पॅटर्न राबविला जाणार आहे.मार्च महिन्यात मे. कनक रिसोर्सेस मॅनजमेंट प्रा. या एजन्सीचा कंत्राट संपत आहे. यामुळे नवीन व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया व नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी गुरुवारी दिली.कचरा संकलन हा शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यात घराघरातून कचरा संकलन करण्यासाठी दोन एजन्सी नियुक्त करण्यात येतील. ओला, सुका व जैविक कचरा वेगवेगळा संकलित केला जाणार आहे. अशा प्रकारची वाहने उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक झोनक्षेत्रात ट्रान्सफर स्टेशन निर्माण करण्यात येईल. यात कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येईल. भविष्यात डम्पिंगयार्डची गरजच भासणार नाही. आरोग्य विभाग मागील सहा महिन्यांपासून यावर काम करीत आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. देशात अशा प्रकारची अद्ययावत यंत्रणा असलेल्या शहरांचा अभ्यास दौरा करून माहिती संकलित केली आहे. ज्या भागात मोठी वाहने जाणे शक्य होणार नाही, अशा ठिकाणी ई-रिक्षांच्या माध्यमातून कचरा संकलित केला जाणार आहे. तसेच डम्पिंगयार्ड येथे कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्यात येईल. कचरा संकलनाची नवीन यंत्रणा उभारली जात आहे.दहा वर्षात एक हजार कोटींचा खर्च‘कचराघर विरहित शहर’ योजना राबविली जाणार आहे. यासाठी १० वर्षांच्या कालावधीसाठी निविदा मागविण्यात येणार आहे. नागपूर शहरात दररोज ८०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर दहा वर्षाच्या कालावधीत सुमारे एक हजार कोटींचा खर्च येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.वॉकीटॉकीच्या माध्यमातून नियंत्रणशहरातील कचरा संकलन, त्यावर प्रक्रिया व त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जाणार आहे. यासाठी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा राहणार आहे. या यंत्रणेचे संचालन नियंत्रण कक्षातून केले जाईल. वाहनांना सूचना देण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जाणार आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न