शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

गोवारी आंदोलकांची प्रकृती अत्यवस्थ; शिष्टमंडळ मुंबईत ताटकळत

By मंगेश व्यवहारे | Updated: January 31, 2024 22:09 IST

: गोवारींचा संताप रस्त्यावर

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने गोंडगोवारी संदर्भात दिलेल्या निकालातील परिच्छेत क्रमांक ८३ मध्ये संस्कृती आणि रुढी परंपरा लक्षात घेऊन व १९५० पूर्वीचे पुरावे लक्षात घेऊन, गोंडगोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार प्रदान करण्यात यावेत, असा उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत यवतमाळचे सचिन चचाने, वर्धा येथील किशोर चौधरी व बुलढाण्याचे चंदन कोहरे २६ जानेवारीपासून संविधान चौकात आमरण उपोषणास बसले आहेत. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. समाजात आंदोलनावरून प्रचंड संताप असून, विदर्भातून गोवारी बांधव आंदोलनात सहभागी होऊन संताप व्यक्त करीत आहेत.

आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात उपोषण सुरू केले आहे. २४ एप्रिल १९८५ च्या जीआरमध्ये गोंड गोवारी जमातीबाबतची माहिती चुकीची असून, संविधान व कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे गोंड गोवारींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत आहेत. समाजाच्या विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे सर्व लाभ व पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. त्यांना तत्काळ शिष्यवृत्ती मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान गाेवारी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी कृती समितीच्या प्रतिनिधींची चर्चा झाली.

त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी २०२० च्या न्यायालयीन निकालाचा अभ्यास करून सकारात्मक मुद्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले हाेते. परंतु, एक महिना उलटूनही सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. शहरात एकीकडे गोवारी बांधव आंदोलनास बसले असताना समितीच्या शिष्टमंडळाला सरकारने चर्चेसाठी बोलाविले होते. कैलास राऊत, रूपेश चामलाटे, रामदास नेवारे, लेखराज नेवारे, गजानन कोहळे, सुदर्शन चामलोट यांचे शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात असून, त्यांना भेटायला सरकारजवळ वेळ नसल्याचा आरोप कैलास राऊत यांनी केला.