शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोवारी आंदोलकांची प्रकृती अत्यवस्थ; शिष्टमंडळ मुंबईत ताटकळत

By मंगेश व्यवहारे | Updated: January 31, 2024 22:09 IST

: गोवारींचा संताप रस्त्यावर

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने गोंडगोवारी संदर्भात दिलेल्या निकालातील परिच्छेत क्रमांक ८३ मध्ये संस्कृती आणि रुढी परंपरा लक्षात घेऊन व १९५० पूर्वीचे पुरावे लक्षात घेऊन, गोंडगोवारींना अनुसूचित जमातीचे अधिकार प्रदान करण्यात यावेत, असा उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत यवतमाळचे सचिन चचाने, वर्धा येथील किशोर चौधरी व बुलढाण्याचे चंदन कोहरे २६ जानेवारीपासून संविधान चौकात आमरण उपोषणास बसले आहेत. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. समाजात आंदोलनावरून प्रचंड संताप असून, विदर्भातून गोवारी बांधव आंदोलनात सहभागी होऊन संताप व्यक्त करीत आहेत.

आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वात उपोषण सुरू केले आहे. २४ एप्रिल १९८५ च्या जीआरमध्ये गोंड गोवारी जमातीबाबतची माहिती चुकीची असून, संविधान व कायद्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे गोंड गोवारींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत आहेत. समाजाच्या विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे सर्व लाभ व पदवी प्रमाणपत्र रोखले आहे. त्यांना तत्काळ शिष्यवृत्ती मिळावी अशी आंदोलकांची मागणी आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान गाेवारी बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी कृती समितीच्या प्रतिनिधींची चर्चा झाली.

त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी २०२० च्या न्यायालयीन निकालाचा अभ्यास करून सकारात्मक मुद्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले हाेते. परंतु, एक महिना उलटूनही सरकारकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. शहरात एकीकडे गोवारी बांधव आंदोलनास बसले असताना समितीच्या शिष्टमंडळाला सरकारने चर्चेसाठी बोलाविले होते. कैलास राऊत, रूपेश चामलाटे, रामदास नेवारे, लेखराज नेवारे, गजानन कोहळे, सुदर्शन चामलोट यांचे शिष्टमंडळ गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालयात असून, त्यांना भेटायला सरकारजवळ वेळ नसल्याचा आरोप कैलास राऊत यांनी केला.