शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या दणक्यानंतर सरकारला जाग, अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 21, 2023 19:20 IST

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. सरकारने आज (गुरुवारी) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहून अंबाझरी तलावाच्या सुरक्षिततेसह इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि यासंदर्भात येत्या १२ जानेवारीपर्यंत आराखडा सादर करण्याची ग्वाही दिली.

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते. त्यामध्ये धरण सुरक्षा संघटनेने अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी योजना तयार करावी, त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, निधीची कमतरता आहे म्हणून योजनेतील कामे थांबविता येणार नाही, या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांची राहील यासह इतर काही आदेशांचा समावेश होता. त्यानंतर पाच वर्षे लोटून गेली, पण संबंधित आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली नाही. 

दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला. परिणामी, न्यायालयाने ६ डिसेंबर २०२३ रोजी राज्य सरकारला फटकारून मुख्य सचिवांना यावर उत्तर मागितले होते. त्यानंतर प्रकरणावर २० डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य सचिवांच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करून ही सरकारची असंवेदनशीलता आहे, असे ताशेरे ओढले व याची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिवांना समन्स बजावला होता व गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. करिता, सरकारने ठोस भूमिकेसह न्यायालयात हजर राहून ही ग्वाही दिली.

पुढील सुनावणी १७ जानेवारीलान्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी सरकारने दिलेली माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर येत्या १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. अंबाझरी तलावातील पाण्यामुळे आलेल्या महापुरासंदर्भात रामगोपाल बाचुका व इतर तीन पीडित नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय