शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

हायकोर्टाच्या दणक्यानंतर सरकारला जाग, अंबाझरी तलावासाठी उच्चस्तरीय समिती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: December 21, 2023 19:20 IST

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी कानउघाडणी केल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. सरकारने आज (गुरुवारी) उच्च न्यायालयामध्ये पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहून अंबाझरी तलावाच्या सुरक्षिततेसह इतर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची आणि यासंदर्भात येत्या १२ जानेवारीपर्यंत आराखडा सादर करण्याची ग्वाही दिली.

उच्च न्यायालयाने २१ मार्च २०१८ रोजी एक जनहित याचिका निकाली काढताना अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी विविध आदेश दिले होते. त्यामध्ये धरण सुरक्षा संघटनेने अंबाझरी तलावाला सुरक्षित करण्यासाठी योजना तयार करावी, त्या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, निधीची कमतरता आहे म्हणून योजनेतील कामे थांबविता येणार नाही, या आदेशांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्य सचिवांची राहील यासह इतर काही आदेशांचा समावेश होता. त्यानंतर पाच वर्षे लोटून गेली, पण संबंधित आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली नाही. 

दरम्यान, गेल्या सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे अंबाझरी तलावाचे पाणी विविध वस्त्यांमध्ये शिरून हाहाकार माजला. परिणामी, न्यायालयाने ६ डिसेंबर २०२३ रोजी राज्य सरकारला फटकारून मुख्य सचिवांना यावर उत्तर मागितले होते. त्यानंतर प्रकरणावर २० डिसेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी मुख्य सचिवांच्या वतीने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यावर प्रचंड नाराजी व्यक्त करून ही सरकारची असंवेदनशीलता आहे, असे ताशेरे ओढले व याची गंभीर दखल घेऊन मुख्य सचिवांना समन्स बजावला होता व गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता. करिता, सरकारने ठोस भूमिकेसह न्यायालयात हजर राहून ही ग्वाही दिली.

पुढील सुनावणी १७ जानेवारीलान्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी सरकारने दिलेली माहिती रेकॉर्डवर घेऊन या प्रकरणावर येत्या १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. अंबाझरी तलावातील पाण्यामुळे आलेल्या महापुरासंदर्भात रामगोपाल बाचुका व इतर तीन पीडित नागरिकांनी जनहित याचिका दाखल केली आहे. अंबाझरी तलाव व नाग नदी परिसरातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यात यावी, अंबाझरी तलाव किती सुरक्षित आहे, याचा अभ्यास करण्यात यावा इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय