शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांवर कोरोनाच्या रूपात नैसर्गिक संकट आले. उद्योग, व्यापार सर्व बंद असल्यामुळे लोकांच्या खिशात पैसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांवर कोरोनाच्या रूपात नैसर्गिक संकट आले. उद्योग, व्यापार सर्व बंद असल्यामुळे लोकांच्या खिशात पैसे नाहीत. दुसरीकडे सरकारने तीन महिन्याचे बिल एकत्र पाठवले. इतकेच नव्हे तर १ एप्रिल २०२० पासून २१ टक्के वाढीव बिल पाठवण्यात आले. त्यामुळे सामान्य माणूस हे बिल भरू शकत नाही. जनतेवर नैसर्गिक संकट येते तेव्हा सरकार त्याच्या मदतीसाठी पुढे येते. त्यामुळे कोरोना काळातील वीज बिल सरकारनेच भरावे, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.

या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सोमवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात १०० ठिकाणी धरणे व ठिय्या आंदोलन करण्यात आले. नागपुरात व्हेरायटी चाैक, सीताबर्डी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, या मागणीसोबतच २०० युनिटपर्यंत वीज बिल फ्री करण्यात यावे, त्यानंतरचे वीज दर निम्मे करावे. कृषी पंपाचे वीज बिल संपवण्यात यावे व विदर्भातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीसााठी सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदाेलनात मुकेश मासुरकर, अरुण केदार, विष्णूजी आष्टीकर, रेखा निमजे, सुनीता येरणे, गुलाबराव धांडे, प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर, अरुण भोसले आदींसह मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते.

बॉक्स

...अन्यथा ऊर्जामंत्र्यांच्या घराला घेराव

कोरोना काळातील वीज बिलाबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर यापुढे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.