शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

राज्यपालांनी घेतली विकास कामांची माहिती

By admin | Updated: November 8, 2014 02:48 IST

तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे ...

नागपूर: तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी नागपूर येथे राजभवनावर विदर्भातील विविध विकास कामांची माहिती घेतली. सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामावर भर देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे ४ तारखेला विदर्भ दौऱ्यासाठी नागपूरमध्ये आगमन झाले. ५ तारखेपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. दोन दिवस अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केल्यावर आज राजभवनावर त्यांनी विदर्भातील विविध विकास योजनांच्या १४ मुद्यांवर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून अधिकाऱ्यानी त्यांना ही माहिती दिली. त्यात प्रामुख्याने प्रामुख्याने मिहान, गोसेखुर्द प्रकल्पांसह सिंचन योजना व नागपूर विभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.राज्यपालांनी सुरुवातीला मिहान प्रकल्पाची माहिती घेतली. जयताळा व शिवणगाव येथील नागरिकांचा भूसंपदानास विरोध असल्याने अडचण निर्माण झाल्याचे अधिकाऱ्याकडून यावेळी सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाकडून मंत्रालयात प्रलंबित असलेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. गोसेखुर्द प्रकल्पाचा प्रश्नही कमी अधिक प्रमाणात मिहानसारखाच आहे. पुनर्वसन आणि भूसंपादनास उशीर होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.नागपूर विभागात ७३ प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे. यावर १२३४ कोटीचा अतिरिक्त निधी लागणार आहे. यास मंजुुरी मिळाल्यास ४६ हजार हेक्टरमध्ये सिंचन क्षमता वाढणार असल्याचे सांगण्यात आले. सिंचनाचे अनेक प्रकल्प वन खात्याच्या परवानगीसाठी अडले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात वनक्षेत्र अधिक असल्याने या जिल्ह्यातील प्रकल्पांना वन संरक्षण अधिनियमातून सूट देण्यात यावी, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.राज्यपालांनी स्वच्छाता मोहिमेचाही आढावा घेतला. त्याच प्रमाणे वन हक्क कायद्याची माहिती घेतली. सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंवर्धनावर भर देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रमावर भर देण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, मिहान व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)