शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलन बदनामीचे कारस्थान सरकारचे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

नागपूर : सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे कटकारस्थान केंद्र सरकार करीत आहे. संविधानाला अभिप्रेत समाजवाद आणि जनतेचे सार्वभौमत्व या ...

नागपूर : सध्या देशात शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे कटकारस्थान केंद्र सरकार करीत आहे. संविधानाला अभिप्रेत समाजवाद आणि जनतेचे सार्वभौमत्व या मूलभूत तत्त्वाचा मुडदा पाडणारे आहे, अशी टीका समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी केली. आघाडीतर्फे संविधान चौकात संविधान सन्मान रॅलीचे आयाेजन करण्यात आले. यावेळी बाेलताना ते म्हणाले, संविधान विरोधी कारवायांना थांबविण्यासाठी सामाजिक आंदोलनात सहभागी व्हावे. आपण लवकरच राष्ट्रीय पातळीवर सामाजिक आंदोलन पेटविणार आहो, अशी घोषणा प्रा. खैरे यांनी केली. गेल्या ७० वर्षांपासून सुरू असलेले शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणाचे धोरण बंद करण्याचे कटकारस्थान सरकार आखत आहे. ७ फेब्रुवारी २०२० रोजी सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आरक्षणाचा अधिकार संपुष्टात आला असून, आरक्षण देणे न देणे सरकारच्या मर्जीवर राहणार आहे. म्हणजे आरक्षणाला सुरुंग लागला असल्याची टीका त्यांनी केली.

प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी तर संचालन सुनील जांभुळकर यांनी केले. करुणा दाभणे यांनी आभार मानले. आयोजनात एल. पी. रामटेके, केशव सोमकुवर, अशोक मेश्राम, भीमराव नंदेश्वर, दादाराम गेडाम, चंद्रभागा पानतावणे, संगीता खोब्रागडे, माधवी फुलझेले, चंद्रशेखर उके, लालचंद लव्हात्रे, तुकाराम सोनारे, दादाराव तागडे, माणिकराव सूर्यवंशी, सुगत रामटेके, नामदेव फर्किडे, सारथीकुमार सोनटक्के, भाऊराव सुखदेवे आदींचा सहभाग हाेता.