शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
4
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
5
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
6
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
7
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
8
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
9
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
10
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
11
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
12
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
13
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
14
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
15
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
16
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
17
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
18
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
19
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?

प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल

By admin | Updated: December 24, 2016 02:55 IST

प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्तीचा विनाश याची कारणमीमांसा सांगणारे, प्रकृतीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अखिल भारतीय वेद संमेलनाला सुरूवात नागपूर : प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्तीचा विनाश याची कारणमीमांसा सांगणारे, प्रकृतीचे संवर्धन, व्यक्ती-समाज-राष्ट्राला कुठल्या दिशेने जावे हे मूल्य वेदाने आम्हाला दिले आहे. वेद हे चिरंतर आहे. जगात शाश्वत विकासाची चर्चा होत असताना, प्रकृतीचे शोषण करू नये हे वेदांनी फार पूर्वीच सांगितले आहे. वेदातील वैज्ञानिक विचारांचा समाज आणि जगात प्रचार प्रसार व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वेदातील विज्ञान पोहचावे, वेदातील भ्रांती दूर व्हावी, यासाठी प्राचीन वेदांच्या संवर्धनासाठी सरकार काम करेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. धर्मसंस्कृती महाकुंभात महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानतर्फे वेद महर्षी विनायकभट्ट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय वेद संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. संमेलनाला ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री देवनाथपीठाचे जितेंद्रनाथ महाराज, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. उमा वैद्य, महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र मुळे, वेदाचार्य घैसास गुरुजी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर मिश्र, आयोजक मोरेश्वर घैसास, निमंत्रक कृष्णाशास्त्री आर्वीकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. उमा वैद्य म्हणाल्या की, वेद हे विश्वाचे आद्य वाङ्मय आहे. एखादी विद्या १० हजार वर्षे टिकवून ठेवणे हे केवळ भारतातच शक्य झाले आहे. तेही केवळ वैदिक पंडितांनी केलेल्या तपस्येतून शक्य झाले आहे. वैदिक पंडितांच्या माध्यमातून वेदांचे रक्षण होत आहे. मात्र वेदांना समाजमान्य करण्यासाठी वैदिक विषयांमध्ये संशोधन करणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. वेदांमध्ये विज्ञानाचे विषय आहे. त्याची चर्चा व्हायला हवी. मुख्यमंत्र्यांनी संस्कृत अकादमीची घोषणा केली आहे. त्यातच वेदांच्या संशोधनाचे केंद्रसुद्धा स्थापन व्हावे, अशी अपेक्षा उमा वैद्य यांनी यावेळी केली. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपले अध्यक्षीय मत व्यक्त करताना म्हणाले की, वेद हे भारतातील सनातन धर्माचे मूळ आहे. जगातले सर्व धर्म सनातन धर्माशी सुसंगत आहेत. हिंदुत्व ही विचारधारा आहे, जीवनशैली आहे. संमेलनाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी) रामजन्मभूमीच्या कार्यासाठी योग्य वेळ संमेलनाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असताना, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले की, धर्मसत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी राजसत्ता सहभागी झाली आहे. धर्मसत्तेच्या प्रसारासाठी हे महत्त्वाचे आहे. हीच वेळ रामजन्मभूमीच्या कार्याची खरी वेळ आहे. याचा लाभ घ्यावा, ही वेळ सोडू नका, असी सूचना शंकराचार्यांनी व्यासपीठावरील राजकारण्यांना केली.