शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:07 IST

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स : जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन नागपूर : नागपुरात १ जूनपासून बाजारपेठा सुरू करण्यासह व्यापाऱ्यांना ...

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स : जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन

नागपूर : नागपुरात १ जूनपासून बाजारपेठा सुरू करण्यासह व्यापाऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशा मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले. निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांना पाठविली आहे.

चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील व्यापारी गेल्या वर्षीपासून लॉकडाऊनचा मार सहन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. व्यापारी वर्ग आर्थिक अडचणींमुळे मानसिकरीत्या आजारी होत आहे. व्यापारी उद्योगांतर्फे निर्मिती मालाचा पुरवठा ग्राहकांपर्यंत करतो. सोबतच व्यापारी वर्ग व्यवसायाद्वारे करांचे संग्रहण सरकारी खजिन्यात जमा करतो. त्यांच्या कराच्या भरोशावर सरकार चालते. जर व्यवसाय बंद राहिल्यास व्यापारी कर कुठून भरणार? सर्व निर्बंध व्यापाऱ्यांसाठीच का? उद्योग क्षेत्र वस्तूंची निर्मिती करेल, पण ठोक आणि किरकोळ बाजार बंद राहिल्यास वस्तूंची विक्री कुठे आणि कशी होणार हे गंभीर प्रश्न आहेत.

तीन महिने व्यवसाय बंद असल्याने, व्यापारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घराचे भाडे, दैनंदिन खर्च उचलणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आपत्ती आली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी द्यावी आणि सोबत गेल्या वर्षीप्रमाणे लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीतून बाहेर येण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी.

चेंबरचे सहसचिव उमेश पटेल म्हणाले, जून महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. तीन महिने दुकाने बंद राहिल्याने, पावसामुळे दुकानातील माल खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. त्यातून त्यांना बाहेर निघणे कठीण होईल. व्यापारी महामारीने नव्हे, तर लॉकडाऊनमुळे येणाऱ्या आर्थिक समस्यांनी संपून जाईल. चेंबरचे सचिव स्वप्निल अहिरकर म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, सरकारी नियमांतर्गत व्यापाऱ्यांना बाजारपेठा नियमित सुरू करण्याची परवानगी द्यावी.’ निवेदन देताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.