शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सरकारने व्यापाऱ्यांना व्यवसायाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:07 IST

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स : जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन नागपूर : नागपुरात १ जूनपासून बाजारपेठा सुरू करण्यासह व्यापाऱ्यांना ...

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स : जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन

नागपूर : नागपुरात १ जूनपासून बाजारपेठा सुरू करण्यासह व्यापाऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे, अशा मागणीचे निवेदन नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांना दिले. निवेदनाची प्रतिलिपी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांना पाठविली आहे.

चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील व्यापारी गेल्या वर्षीपासून लॉकडाऊनचा मार सहन करीत आहेत. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. व्यापारी वर्ग आर्थिक अडचणींमुळे मानसिकरीत्या आजारी होत आहे. व्यापारी उद्योगांतर्फे निर्मिती मालाचा पुरवठा ग्राहकांपर्यंत करतो. सोबतच व्यापारी वर्ग व्यवसायाद्वारे करांचे संग्रहण सरकारी खजिन्यात जमा करतो. त्यांच्या कराच्या भरोशावर सरकार चालते. जर व्यवसाय बंद राहिल्यास व्यापारी कर कुठून भरणार? सर्व निर्बंध व्यापाऱ्यांसाठीच का? उद्योग क्षेत्र वस्तूंची निर्मिती करेल, पण ठोक आणि किरकोळ बाजार बंद राहिल्यास वस्तूंची विक्री कुठे आणि कशी होणार हे गंभीर प्रश्न आहेत.

तीन महिने व्यवसाय बंद असल्याने, व्यापारी कर्मचाऱ्यांना वेतन देऊ शकत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. घराचे भाडे, दैनंदिन खर्च उचलणे कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आपत्ती आली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने व्यापाऱ्यांना व्यवसायाची परवानगी द्यावी आणि सोबत गेल्या वर्षीप्रमाणे लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीतून बाहेर येण्यासाठी व्यापाऱ्यांना सरकारने आर्थिक पॅकेजची घोषणा करावी.

चेंबरचे सहसचिव उमेश पटेल म्हणाले, जून महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. तीन महिने दुकाने बंद राहिल्याने, पावसामुळे दुकानातील माल खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. त्यातून त्यांना बाहेर निघणे कठीण होईल. व्यापारी महामारीने नव्हे, तर लॉकडाऊनमुळे येणाऱ्या आर्थिक समस्यांनी संपून जाईल. चेंबरचे सचिव स्वप्निल अहिरकर म्हणाले, ‘कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने, सरकारी नियमांतर्गत व्यापाऱ्यांना बाजारपेठा नियमित सुरू करण्याची परवानगी द्यावी.’ निवेदन देताना चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सहसचिव उमेश पटेल, स्वप्निल अहिरकर, जनसंपर्क अधिकारी राजवंतपाल सिंग तुली उपस्थित होते.