शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

‘वज्रमूठ’ सभा रोखण्यासाठी सरकार पुरस्कृत प्रयत्न; विनायक राऊत यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 16:56 IST

Nagpur News संभाजीनगरमघ्ये वज्रमुठ सभा होऊ नये म्हणून जातीय तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार पुरस्कृत होता. नागपूरातंही तोच प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

नागपूर : संभाजीनगरमघ्ये वज्रमूठ सभा होऊ नये म्हणून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार पुरस्कृत होता. नागपुरातही तोच प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. लाखांची सभा होणार आहे, म्हणून काही लोकांना पोटशूळ उठलं आहे. या सभेची विरोध केला जातोय. नागपुरातील सभा गर्दीचा उच्चांक मोडणारी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

राऊत हे मंगळवारी रात्री नागपुरात दाखल झाले. त्यांनी सभा मैदानाची पाहणी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत नियोजन बैठकीत ते सहभागी झाले. बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सभेच्या तयारीवर समाधान व्यक्त करीत या सभेला पूर्व विदर्भातून लाखो लोक येणार असल्याचा दावा केला. सभेत ५० हजार खुर्च्या लावल्या जातील. बाहेर सभा बघण्यासाठी स्क्रिन लागतील. मैदानाच्या परिसरात लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ, असे सांगत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्यासाठी सभेत बसण्याची सोय करू, असा टोलाही त्यांनी लगावला. - हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकांना आधार देण्यासाठी वज्रमूठ सभा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वीर सावरकर गौरव यात्रेसोबतच सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी करावी, असा सल्ला त्यांनी भाजपला दिला.

असंतुष्ट आमदारांसाठी अयोध्यावारी

- दीड महिन्यांपासून अवकाळी पाऊस होत आहे. हातातोंडाशी आलेली पीक उध्वस्त झाले. विदर्भातील शेकडो घरांचे नुकसान झाले. पण दुर्दैवाने मिंधे सरकारला शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी वेळ मिळाला नाही. असंतुष्ट आमदारांमघ्ये बंडखोरीची भावना निर्माण झालीय. म्हणून अयोध्यावारी करावी लागली. सदबुद्धी येऊन अयोध्या वारीनंतर शेतकऱ्यांना मदत जाहिर करतील, असे वाटत होतं पण तसं झालं नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत