शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

अनाथ मुलींच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी; तुमाने यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:03 IST

Nagpur News देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली.

नागपूर : देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली. सोबत १८ वर्षांनंतर लग्नापर्यंत या मुलींना अनाथालयातच राहू द्यावे, असेही निवेदन केले.

खासदार तुमाने म्हणाले, भारतात सुमारे साडेतीन कोटी मुले अनाथ असून, दरवर्षी यात भर पडत आहे. या विषयी निती आयोगाने अद्याप सर्वेक्षण केले नाही व त्याबाबत माहिती गोळा केली नाही. युनिसेफच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) भारतातील अनाथ मुलांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. देशभरात गैरसरकारी संस्था अनाथालये चालवितात. मात्र येथे असलेल्या अनाथांना १८ वर्षांचे झाल्यावर अनाथालय सोडावे लागते. यानंतर खऱ्या अर्थाने अनाथांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मुलींची स्थिती अधिकच बिकट होते. दरवर्षी मोठ्या संख्येत महिलांच्या अपहरणाच्या घटना समोर येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा दिला आहे. योग्य वराचा शोध घेऊन त्यांच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी सोबतच त्यांच्या लग्नापर्यंत अनाथालयात ठेवण्यात यावे. शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्च केंद्र सरकाने उचलावा, अशी अशी मागणी खासदार तुमाने यांनी केली.

अतिवृष्टीग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या

- अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीने एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी तुमाने यांनी अमित शहा यांच्याकडे यावेळी केली.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमाने