शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलींच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी; तुमाने यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:03 IST

Nagpur News देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली.

नागपूर : देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खा. कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मंगळवारी दिल्ली येथे भेटून केली. सोबत १८ वर्षांनंतर लग्नापर्यंत या मुलींना अनाथालयातच राहू द्यावे, असेही निवेदन केले.

खासदार तुमाने म्हणाले, भारतात सुमारे साडेतीन कोटी मुले अनाथ असून, दरवर्षी यात भर पडत आहे. या विषयी निती आयोगाने अद्याप सर्वेक्षण केले नाही व त्याबाबत माहिती गोळा केली नाही. युनिसेफच्या संकेतस्थळावर (वेबसाइट) भारतातील अनाथ मुलांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. देशभरात गैरसरकारी संस्था अनाथालये चालवितात. मात्र येथे असलेल्या अनाथांना १८ वर्षांचे झाल्यावर अनाथालय सोडावे लागते. यानंतर खऱ्या अर्थाने अनाथांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मुलींची स्थिती अधिकच बिकट होते. दरवर्षी मोठ्या संख्येत महिलांच्या अपहरणाच्या घटना समोर येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा नारा दिला आहे. योग्य वराचा शोध घेऊन त्यांच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी सोबतच त्यांच्या लग्नापर्यंत अनाथालयात ठेवण्यात यावे. शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्च केंद्र सरकाने उचलावा, अशी अशी मागणी खासदार तुमाने यांनी केली.

अतिवृष्टीग्रस्तांना एकरी ५० हजारांची मदत द्या

- अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीने एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी तुमाने यांनी अमित शहा यांच्याकडे यावेळी केली.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमाने