शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सरकार पाकीटमार मंत्री घोटाळेबाज

By admin | Updated: December 23, 2015 03:39 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते.

विखे पाटील यांची घणाघाती टीका : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीनागपूर : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते. एवढेच काय तर उच्च न्यायालयादेखील प्रशासकीय कामांमध्ये मंत्र्यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर ताशेरे ओढावे लागतात. डाळींचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरते, अशी घणाघाती टीका करीत पाकीटमार सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. नियम २९२ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले, शिवसेना व भाजपमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळेच सरकारला डाळीच्या किमतीवर नियंत्रण आणण्यात अपयश आले. डाळीचे दरवाढीत चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. सनातन संस्थेला क्लीन चिट देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यात महिला व दलितांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करीत पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची मागणी त्यांनी केली. आदिवासी विभागात ई-टेंडर न करता लाखो रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. कुपोषणग्रस्त बालकांच्या आहार पुरवठ्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील प्रकरणाचा हवाला देत त्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.(प्रतिनिधी)