शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज मुद्द्यावर सरकारची लबाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वीज बिल मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा राज्य शासनावर टीकास्त्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वीज बिल मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा राज्य शासनावर टीकास्त्र सोडले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी थकबाकीदारांची वीज कापणार नाही, असे सरकारने आश्वासन दिले व शेवटच्या दिवशी नेमके उलटे वक्तव्य करण्यात आले. सरकारला केवळ अधिवेशन काढायचे होते. त्यामुळेच वीज मुद्द्यावर लबाडी केली असल्याचे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतर गुरुवारी त्यांचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अधिवेशनातून महाराष्ट्राला बऱ्याच अपेक्षा होत्या; मात्र प्रत्यक्षात अधिवेशनातून काहीच मिळाले नाही. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची तर मोठी निराशा झाली. विरोधकांनी केवळ सेन्सेशनल मुद्दे उचलले, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे; मात्र आम्ही कोरोना, वीज, शेती यांसारखे सर्वसामान्यांशी जुळलेले मुद्दे मांडले. शिवसेनेला हे जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. केवळ टोचणाऱ्या व बोचणाऱ्या मुद्द्यांचा घाव त्यांच्या वर्मी बसला, असे फडणवीस म्हणाले.

कोरोनाकडे सरकारचे लक्ष नाही

राज्यात कोरोना वाढतो आहे; मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कोरोना नियंत्रणाची व्यवस्था नसल्याचे चित्र आहे. अधिवेशन आले की कोरोना वाढतो. मग अधिवेशनादरम्यान तो कमी असतो आणि संपल्यानंतर तो पुन्हा वाढतो. सरकारला अधिवेशन टाळण्यासाठीच कोरोना दिसतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.