शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
7
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
8
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
9
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
10
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
11
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
12
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
13
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
14
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
15
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
16
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
17
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
18
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
19
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
20
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?

वीज महागल्यास सरकार हस्तक्षेप करणार

By admin | Updated: March 3, 2015 01:33 IST

विजेच्या दरांमध्ये वाढ करण्यासंबंधात महावितरणतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक

नागपूर : विजेच्या दरांमध्ये वाढ करण्यासंबंधात महावितरणतर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगासमोर याचिका दाखल करण्यात आली आहे. यादरम्यान सरकार जनतेवर अधिक भार पडू देणार नाही, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. विजेच्या दरासंदर्भातील अंतिम निर्णय हा आयोगाचाच असेल मात्र नागरिकांवर अधिक भार पडू देणार नाही, असे आश्वासन देत शासन यात हस्तक्षेप करेल, असे संकेतही दिले आहे. पत्रकारांशी चर्चा करताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, सध्या विजेचे दर वाढलेले नाहीत. मागच्या आघाडी सरकारने निवडणुका लक्षात घेऊन वीज दर नियंत्रित ठेवण्यासाठी दरमहा ७०६ कोटी रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही सबसिडी बंद झाली आहे. राज्य सरकार अपारंपरिक ऊर्जा धोरणासह ऊर्जा संवर्धन धोरणाची घोषणा अर्थसंकल्पापूर्वी करण्याचा प्रयत्न करेल. याअंतर्गत ११,१०० मेगावॉट वीज उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यात ७५०० मेगावॉट वीज सौर, अडीच हजार वायु आणि एक हजार कोजेन (साखर उत्पादन) आणि ५०० मेगावॉट वीज इतर स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र देशातील एकूण अपारंपरिक ऊर्जेच्या १० टक्के ऊर्जा उत्पादन करणारे राज्य असेल. याअंतर्गत इमारतींवर सौर ऊर्जा उपकरण लावले जातील आणि एलईडीचाही उपयोग होईल. कृषी पंपधारकांना अनेकदा मीटर रिंडंग न करताच विजेचे बिल दिले जात असल्याची बाब ऊर्जामंत्र्यांनी मान्य केली. ही समस्या सोडविण्यासाठी सरकार ‘फिडर फ्रेन्चाईजी’ या संकल्पनेवर काम करीत आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या इलेक्ट्रिकल किंवा मॅकेनिकल इंजिनियरवर लॉटरी पद्धतीच्या आधारावर जबाबदारी सोपविली जाईल. शाखा अभियंता यांच्या मदतीने फिडर मॅनेजर हे ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेतील आणि त्यांना बिल देऊन मूलभूत सुविधा प्रदान करतील. यासाठी अभियंत्यांना इलेक्ट्रिकल काम करण्यासाठी लायसन्स देण्यात येईल. ही योजना सध्या महावितरण क्षेत्रात लागू होईल.(प्रतिनिधी) ...तर महावितरण करेल नागपुरात पुरवठा ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी वीज वितरण फ्रेंचाईसी कंपनी ‘एसएनडीएल’वर प्रहार केला. सरकारकडे असे अनेक मुद्दे आहेत, ज्या आधारावर सरकार कंपनीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकते. त्यामुळे चौकशी समितीची घोषणा करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे. ही समिती एसएनडीएलने महावितरणशी झालेल्या कराराचे उल्लंघन केले किंवा नाही, याची चौकशी करेल. समितीच्या अहवालात कराराचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यास एसएनडीएलवर कारवाई होईल. अशा परिस्थितीत महावितरणलाच नागपूर शहरात वीज पुरवठा करण्याची जबाबदारी दिली जाईल.