शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

गुड न्यूज... चार तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:11 IST

() नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास अटकाव घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ...

()

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून शहरातील तलावांवर गणपती विसर्जनास अटकाव घातल्यामुळे तलावातील पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाला आहे. नागपुरातील ग्रीन विजिल फाउंडेशन या संस्थेने शहरातील ४ तलावांतील पाण्याचे परीक्षण केले. त्यांच्या निरीक्षणात पाण्याच्या गुणवत्तेत सुधार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

तलावातील पाण्याची गुणवत्ता ही पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, गढूळपणा व पाण्यातील क्षाराचे प्रमाण या आधारावर नोंदली जाते. ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून पाण्याची गुणवत्ता परीक्षणाचे काम करते. गणपती विसर्जनापूर्वी, विसर्जनानंतर व फेब्रुवारी महिन्यात अशा तीन वेळा परीक्षण केले जाते. संस्थेद्वारे हा डाटा अर्थइको इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संस्थेला पाठविला जातो. ‘अर्थइको’ ही संस्था दरवर्षी देशातील नदी व तलावांच्या गुणवत्तेचा डाटा प्रकाशित करते. ग्रीन विजिलचे मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, सुरभी जैस्वाल यांनी हे परीक्षण केले.

- तीन तलावातील पाण्याची स्थिती

तलाव ऑक्सिजनचे प्रमाण गढूळपणा क्षार

फुटाळा तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ५० जेटीयू ८ पीएच

गांधीसागर तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ७० जेटीयू ८.२ पीएच

सोनेगाव तलाव ४.५ मि.ग्रा.प्रति लीटर ६५ जेटीयू ८ पीएच

- सक्करदरा तलावाची स्थिती वाईट

या परीक्षणात सक्करदरा तलावाची स्थिती अतिशय खराब आढळली. तलावात पाणी खूप कमी आहे. चारही बाजूने जलकुंभी, गवत पसरले आहे. तलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्र ३ मि.ग्रा.प्रति लीटर आढळली आहे. गढूळपणा ५५ जेटीयू नोंदविण्यात आला आहे. क्षारचे प्रमाण ७.८ पीएच आढळले आहे.

- गेल्या काही वर्षात गणपती विसर्जनापूर्वी घेतलेल्या निरीक्षणात यावर्षी फुटाळा, गांधीसागर, सोनेगाव तलावात सुधार दिसून आला आहे. तलावातील ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलावात फाऊंटेन लावणे गरजेचे आहे. शिवाय गणपती विसर्जन जसे बॅन केले. तसेच इतरही ज्या सणांमध्ये विसर्जन करण्यात येते. तेसुद्धा थांबविणे गरजेचे आहे.

सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन विजिल फाउंडेशन