शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

खूशखबर! उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 10:15 IST

केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केली यादी

आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३८ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया,चांदूर रेल्वे, सावनेर आदी शहरांचा समावेश आहे.राज्य सरकारच्या पथकाने जुले २०१७ मध्ये नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरातील ८० ठिकाणे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. याची माहिती केंद्र सरकारला देऊ न पथकामार्फत नागपूर शहराचा दौरा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या एक सदस्यीय पथकाने शहरातील १०० हून अधिक भागाचा दौरा करून पाहणी केली होती.दौऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसात नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केल्याने महापालिका प्रशासन व सत्तापक्षात आनंदाचे वातावरण आहे.विशेष म्हणजे दोन दिवसानंतर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणातही याचा फायदा मिळणार आहे. हागणदारी मुक्त शहराला ३५० गुण मिळतात. त्यामुळे नागपूर शहराला या वर्गात शंभर टक्के गुण मिळणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी स्वत: शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत चर्चा केली.सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालय बांधण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाला सक्रिय केले. आठ महिन्यात शहरातील संबंधित ठिकाणे निश्चित केली. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाले.

शहरातील जनतेचे सहकार्यासाठी आभारहागणदारीमुक्त शहरात नागपूरचा समावेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हे यश मिळणे शक्य नव्हते. स्वच्छता सर्वेक्षणात याचा फायदा होणार आहे. यामुळे ३५० गुण मिळतील. शहरातील नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक आहेत. कें द्रीय पथक नागपूर दौऱ्यावर येणार असल्याबाबत आॅनलाईन माहिती मिळाली होती.या पथकाने १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. १७०० जियोटेक फोटो काढले. नागरिकांसोबत चर्चा करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होेते.- अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका१०० ठिकाणांची केली पाहणीनागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. यात स्लम, निवासी, व्यावसायिक,शैक्षणिक, रेल्वे परिसर आदींचा समावेश होता. या पथकाला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने पाठविले होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान