शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

खूशखबर! उपराजधानी झाली ‘हागणदारीमुक्त’; महापालिकेत आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 10:15 IST

केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने जाहीर केली यादी

आॅनलाईन लोकमतनागपूर : केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने देशभरातील हागणदारीमुक्त १३८ शहरांची यादी जाहीर केली आहे. यात नागपूरचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील ३८ शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया,चांदूर रेल्वे, सावनेर आदी शहरांचा समावेश आहे.राज्य सरकारच्या पथकाने जुले २०१७ मध्ये नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केले होते. त्यानंतर महापालिकेतर्फे शहरातील ८० ठिकाणे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. याची माहिती केंद्र सरकारला देऊ न पथकामार्फत नागपूर शहराचा दौरा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार २८ ते ३० डिसेंबर दरम्यान केंद्र सरकारच्या एक सदस्यीय पथकाने शहरातील १०० हून अधिक भागाचा दौरा करून पाहणी केली होती.दौऱ्यानंतर अवघ्या तीन दिवसात नागपूर शहराला हागणदारीमुक्त घोषित केल्याने महापालिका प्रशासन व सत्तापक्षात आनंदाचे वातावरण आहे.विशेष म्हणजे दोन दिवसानंतर होणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणातही याचा फायदा मिळणार आहे. हागणदारी मुक्त शहराला ३५० गुण मिळतात. त्यामुळे नागपूर शहराला या वर्गात शंभर टक्के गुण मिळणार आहे. अश्विन मुद्गल यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी स्वत: शहरातील विविध भागांना भेटी देऊन नागरिकांसोबत चर्चा केली.सार्वजनिक व व्यक्तिगत शौचालय बांधण्याचे आवाहन केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या संदर्भात निर्देश दिले. आरोग्य विभागाच्या पथकाला सक्रिय केले. आठ महिन्यात शहरातील संबंधित ठिकाणे निश्चित केली. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे नागपूर शहर हागणदारीमुक्त झाले.

शहरातील जनतेचे सहकार्यासाठी आभारहागणदारीमुक्त शहरात नागपूरचा समावेश झाला आहे ही आनंदाची बाब आहे. यासाठी शहरातील नागरिकांनी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो. एका व्यक्तीच्या प्रयत्नामुळे हे यश मिळणे शक्य नव्हते. स्वच्छता सर्वेक्षणात याचा फायदा होणार आहे. यामुळे ३५० गुण मिळतील. शहरातील नागरिक स्वच्छतेविषयी जागरूक आहेत. कें द्रीय पथक नागपूर दौऱ्यावर येणार असल्याबाबत आॅनलाईन माहिती मिळाली होती.या पथकाने १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. १७०० जियोटेक फोटो काढले. नागरिकांसोबत चर्चा करतानाचे व्हिडिओ अपलोड केले होेते.- अश्विन मुद्गल, आयुक्त महापालिका१०० ठिकाणांची केली पाहणीनागपूर दौऱ्यावर आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने शहरातील १०० हून अधिक ठिकाणांची पाहणी केली. यात स्लम, निवासी, व्यावसायिक,शैक्षणिक, रेल्वे परिसर आदींचा समावेश होता. या पथकाला केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने पाठविले होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान