शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शुभमंगल ‘सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:13 IST

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात ...

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात लग्नकार्ये सुरू केली आहेत. लग्नातील या गर्दीने कुठे हजार तर कुठे दोन हजारांचा आकडा पार केला आहे. या गर्दीतूनच कोरोनाला निमंत्रण मिळत असून आता शुभमंगल ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोना बहुतांशी नियंत्रणात आलेला होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने तोंड वर काढले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे संकट फोफावत आहे. अशात गर्दीची ठिकाणे आव्हान देणारी आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबल्याने या वर्षी लग्न समारंभाची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर दररोज दोन-चार लग्ने आणि त्यात हजारांवर उपस्थितांची गर्दी एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देत आहे.

जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या भिवापूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला. त्यातही कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही लग्न समारंभातील गर्दी थांबण्याचे नाव नाही. सकाळी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारोह या दोन्ही कार्यक्रमांत उसळणारी गर्दी शहरवासीयांना भयभीत करणारी आहे. मात्र या गर्दीपासून प्रशासन गाफील असावे हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

मास्क, सॅनिटायझर, डिस्टन्सिंग कुठाय?

आयोजित लग्न समारंभात उपस्थितांच्या तोंडावरील मास्क गायब झालेला आहे. आयोजकांकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली जात नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे.

कारवाई करा

लॉकडाऊन शिथिल होत असताना अनेकांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. दरम्यान, गर्दी केल्यास आयोजकांसह संबंधित मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लग्नकार्यासाठी परवानगी घेणे महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी वाढविणारे आयोजक व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. नागपूर शहरात कारवाईचे सत्र सुरू असून ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे.