शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
7
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
9
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
10
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
11
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
12
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
13
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
14
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
15
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
16
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
17
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
18
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
20
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी

ग्रामीण भागात शुभमंगल ‘सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:13 IST

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात ...

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात लग्नकार्ये सुरू केली आहेत. लग्नातील या गर्दीने कुठे हजार तर कुठे दोन हजारांचा आकडा पार केला आहे. या गर्दीतूनच कोरोनाला निमंत्रण मिळत असून आता शुभमंगल ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोना बहुतांशी नियंत्रणात आलेला होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने तोंड वर काढले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे संकट फोफावत आहे. अशात गर्दीची ठिकाणे आव्हान देणारी आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबल्याने या वर्षी लग्न समारंभाची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर दररोज दोन-चार लग्ने आणि त्यात हजारांवर उपस्थितांची गर्दी एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देत आहे.

जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या भिवापूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला. त्यातही कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही लग्न समारंभातील गर्दी थांबण्याचे नाव नाही. सकाळी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारोह या दोन्ही कार्यक्रमांत उसळणारी गर्दी शहरवासीयांना भयभीत करणारी आहे. मात्र या गर्दीपासून प्रशासन गाफील असावे हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

मास्क, सॅनिटायझर, डिस्टन्सिंग कुठाय?

आयोजित लग्न समारंभात उपस्थितांच्या तोंडावरील मास्क गायब झालेला आहे. आयोजकांकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली जात नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे.

कारवाई करा

लॉकडाऊन शिथिल होत असताना अनेकांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. दरम्यान, गर्दी केल्यास आयोजकांसह संबंधित मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लग्नकार्यासाठी परवानगी घेणे महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी वाढविणारे आयोजक व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. नागपूर शहरात कारवाईचे सत्र सुरू असून ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे.