शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शुभमंगल ‘सावधान’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:13 IST

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात ...

भिवापूर : लग्नसराईच्या दिवसांत गतवर्षी कोरोनाचे आगमन झाले. त्यात सलग पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबली. आता अनलॉकनंतर अनेकांनी धूमधडाक्यात लग्नकार्ये सुरू केली आहेत. लग्नातील या गर्दीने कुठे हजार तर कुठे दोन हजारांचा आकडा पार केला आहे. या गर्दीतूनच कोरोनाला निमंत्रण मिळत असून आता शुभमंगल ‘सावधान’ म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रशासनाने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कोरोना बहुतांशी नियंत्रणात आलेला होता. रुग्णांची संख्याही रोडावली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोनाने तोंड वर काढले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचे संकट फोफावत आहे. अशात गर्दीची ठिकाणे आव्हान देणारी आहेत. गतवर्षी लॉकडाऊनमुळे लग्नकार्ये थांबल्याने या वर्षी लग्न समारंभाची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात तर दररोज दोन-चार लग्ने आणि त्यात हजारांवर उपस्थितांची गर्दी एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देत आहे.

जिल्ह्यात शेवटच्या टोकावर असलेल्या भिवापूर तालुक्यातही कोरोनाने प्रवेश केला. त्यातही कर्तबगार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची संख्या आटोक्यात होती. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही लग्न समारंभातील गर्दी थांबण्याचे नाव नाही. सकाळी लग्न आणि सायंकाळी स्वागत समारोह या दोन्ही कार्यक्रमांत उसळणारी गर्दी शहरवासीयांना भयभीत करणारी आहे. मात्र या गर्दीपासून प्रशासन गाफील असावे हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

मास्क, सॅनिटायझर, डिस्टन्सिंग कुठाय?

आयोजित लग्न समारंभात उपस्थितांच्या तोंडावरील मास्क गायब झालेला आहे. आयोजकांकडून सॅनिटायझरची व्यवस्थाही केली जात नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. ही चिंतेची बाब आहे.

कारवाई करा

लॉकडाऊन शिथिल होत असताना अनेकांनी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकले. दरम्यान, गर्दी केल्यास आयोजकांसह संबंधित मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. लग्नकार्यासाठी परवानगी घेणे महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे आता कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे गर्दी वाढविणारे आयोजक व मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. नागपूर शहरात कारवाईचे सत्र सुरू असून ग्रामीण भागात गर्दी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे.