शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

श्रीमंत व उद्योगपतींचेच अच्छे दिन

By admin | Updated: September 5, 2015 03:24 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवित आहे. अच्छे दिन केवळ उद्योगपती आणि श्रीमंतांचेच आले आहे, सर्वसामान्य जनता अजूनही महागाईने त्रस्त आहे,

बसपा समीक्षा बैठक : वीरसिंग यांची टीका नागपूर : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवित आहे. अच्छे दिन केवळ उद्योगपती आणि श्रीमंतांचेच आले आहे, सर्वसामान्य जनता अजूनही महागाईने त्रस्त आहे, अशी जाहीर टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंग यांनी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे मेडिकल चौक उंटखाना येथील अजिंठा हॉल येथे शुक्रवारी विदर्भस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रेम रोडेकर, दादाराव उईके, संदीप ताजणे प्रमुख अतिथी होते. खा. वीरसिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला खूप आश्वासने दिली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यापैकी काहीही झाले नाही. उलट सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. तेव्हा अपेक्षाभंग करणाऱ्या या सरकारला धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले, पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाजूने बसपाने संसदेत नेहमीच आवाज उचलला आहे. परंतु शिवसेना व सपाने नेहमीच विरोध केला आहे. ओबीसी आणि एससी, एसटीच्या लोकांसाठी बसपा नेहमीच लढत आहे, परंतु ओबीसी समाज अजूनही बसपाशी जुळलेला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने ओबीसीसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी विलास गरुड यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नागोराव जयकर, सागर डबरासे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, नाना देवगडे, हरीश बेलेकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, उमेश म्हैसकर, मोहन राईकवार, सुनील डोंगरे, मिलिंद बन्सोड, मो. जमाल, आनंद सोमकुंवर, चंद्रशेखर कांबळे, अनिल मेश्राम, नितीन शिंगाडे, प्रशांत पाईक, जितेंद्र घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)