शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

श्रीमंत व उद्योगपतींचेच अच्छे दिन

By admin | Updated: September 5, 2015 03:24 IST

‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवित आहे. अच्छे दिन केवळ उद्योगपती आणि श्रीमंतांचेच आले आहे, सर्वसामान्य जनता अजूनही महागाईने त्रस्त आहे,

बसपा समीक्षा बैठक : वीरसिंग यांची टीका नागपूर : ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे मोदी सरकार लोकांना मूर्ख बनवित आहे. अच्छे दिन केवळ उद्योगपती आणि श्रीमंतांचेच आले आहे, सर्वसामान्य जनता अजूनही महागाईने त्रस्त आहे, अशी जाहीर टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंग यांनी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे मेडिकल चौक उंटखाना येथील अजिंठा हॉल येथे शुक्रवारी विदर्भस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, प्रेम रोडेकर, दादाराव उईके, संदीप ताजणे प्रमुख अतिथी होते. खा. वीरसिंग म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी जनतेला खूप आश्वासने दिली होती. अच्छे दिनचे स्वप्न दाखविले होते. प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यापैकी काहीही झाले नाही. उलट सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. तेव्हा अपेक्षाभंग करणाऱ्या या सरकारला धडा शिकवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पुढे ते म्हणाले, पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाजूने बसपाने संसदेत नेहमीच आवाज उचलला आहे. परंतु शिवसेना व सपाने नेहमीच विरोध केला आहे. ओबीसी आणि एससी, एसटीच्या लोकांसाठी बसपा नेहमीच लढत आहे, परंतु ओबीसी समाज अजूनही बसपाशी जुळलेला नाही. तेव्हा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने ओबीसीसोबत यावे, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी विलास गरुड यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नागोराव जयकर, सागर डबरासे, उत्तम शेवडे, विश्वास राऊत, नाना देवगडे, हरीश बेलेकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, उमेश म्हैसकर, मोहन राईकवार, सुनील डोंगरे, मिलिंद बन्सोड, मो. जमाल, आनंद सोमकुंवर, चंद्रशेखर कांबळे, अनिल मेश्राम, नितीन शिंगाडे, प्रशांत पाईक, जितेंद्र घोडेस्वार प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)