नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या प्रचंड घाईगर्दीच्या व धावपळीच्या प्रचारानंतर मतदान होताच दुसर्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी विवाहाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत पत्नी अनिता, दोेन मुले व कुटुंबीयांसह घरीच दिवस घालवला.तब्बल ४८ ते ५० दिवसांच्या प्रचाराच्या धावपळीत कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास अथवा त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यास हेमंत गोडसे यांना वेळच नव्हता. इतकेच काय, कुटुंबीयांना दोन क्षण देण्यासही त्यांच्याकडे फुरसत नव्हती. रात्री केव्हा तरी एक-दोेन वाजता घरी येऊन झोपायचे आणि पहाटे ५ पासूनच प्रचाराला जुंपायचे, असा त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. आता मतदानानंतर दोन दिवस निव्वळ विश्रांती व आराम करणार असल्याचे गोडसे यांचे म्हणणे आहे. मात्र या दोन दिवसांत दूरध्वनीवरून मित्रमंडळींचे व मदत करणार्यांचे आभारही आपण मानत असल्याचे गोडसे यांचे म्हणणे आहे. २५ एप्रिलला गोडसे यांच्या विवाहाचा वाढदिवस असल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळीच कुटुंबीयांसह रेणुकामाता देवीचे दर्शन घेतले. तसेच दिवसभर घरीच विश्रांती घेणे पसंत केले. (प्रतिनिधी)
गोडसेंनी केला लग्नाचा वाढदिवस साजरा
By admin | Updated: May 13, 2014 13:36 IST