शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

झाडे कापणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे देवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:07 IST

नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची ...

नागपूर : अजनी भागातील पंप हाऊससमाेर हाेमकुंड लागले, त्यात दूध, धूप, तूप टाकून अग्नि पेटला आणि पंडितजी मंत्राेच्चाराने ईश्वराची आराधना करीत हाेते. हे सारे हाेमहवन शांती करण्यासाठी किंवा काैटुंबिक शुभकार्य करण्यासाठी नव्हे तर अजनी वन भागात ताेडण्यात येणारी हजाराे झाडे वाचविण्यासाठी हा खटाटाेप चालला आहे. वृक्षमित्रांनी थेट देवाला साकडे घातले आहे. निर्माण झालेल्या निसर्गाच्या समस्या दूर करण्यासाठी वृक्षसंवर्धनाची गरज असताना येथे हजाराे झाडे बेमुर्वत कापणाऱ्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, या भावनेतून अजनी परिसरात हे हाेमहवन करण्यात आले.

एनएचएआयच्या आयएमएस प्रकल्पासाठी अजनी वन परिसरातील हजाराे झाडे ताेडण्यात येत आहेत. एका माहितीप्रमाणे चार टप्प्यात ४० हजारांवर झाडे कापली जाणार आहेत. त्याविराेधात आंदाेलन चालले असून, ‘हम नागपूरकर’ या संघटनेच्या माध्यमातून नगरसेवक मनाेज गावंडे आणि वृक्षमित्र मनीष चांदेकर यांच्या नेतृत्वात हे अनाेखे आंदाेलन करण्यात आले. ग्रीनसिटी म्हणून असलेली नागपूरची ओळख पुसत चालली आहे. राज्य शासनाच्या ‘माजी वसुंधरा माझी जबाबदारी’ या अभियानात नागपूर शहर २८ व्या स्थानावर फेकल्या गेले आहे. अशावेळी असलेली झाडे वाचविणे ही लाेकांची जबाबदारी आहे. विकास कार्याला अडथळा घालण्याचे कारण नाही. पण पर्यावरणाला हानी पाेहोचविणारा विकास काय कामाचा, असा सवाल मनीष चांदेकर यांनी केला. अशा भकास हाेणाऱ्या शहराला ईश्वरानेच वाचवावे, अशी आर्त हाक वृक्षप्रेमींनी दिली.

मनाेज गावंडे म्हणाले, अजनीचा परिसर रेल्वेची जागा आहे आणि याच भागातून ही झाडे कापली जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेमंत्री पीयूष गाेयल यांची संमती आहे का, असा सवाल करीत आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीच झाडे वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वृक्षप्रेमी सतीश यादव, भरत यादव, मुकेश शर्मा आदी उपस्थित हाेते.

जन अधिकारतर्फे निषेध

जन अधिकार पार्टीनेही अजनी वनातील वृक्षताेडीचा निषेध केला आहे. विकासाच्या नावाखाली १००-१५० वर्षे जुनी हजाराे झाडे कापून पर्यावरणाची हानी केली जात आहे आणि दुसरीकडे वृक्षलागवड करण्याचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आराेप पार्टीचे वासुदेव चाैधरी यांनी केला. वसुंधरेची हानी करण्याची या सरकारला हाैस आहे का, असा सवाल त्यांनी केला. या निषेध आंदाेलनात सुषमा माैर्य, फिराेज शेख, मुकेश माैर्य, प्रभाकर वानखडे, पंढरी देशमुख, गीता भडकवाडे, गीता दायीर, लता राऊत आदींचा सहभाग हाेता.