शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

जीएम वांग्याच्या बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना ...

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना दिसत आहे. अशाच मार्गाने कापसाच्या जीएम बियाण्यांचा प्रसार केल्यानंतर आता वांग्याच्या जीएम बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या बियाण्यांमुळे भविष्यात पर्यावरणावरील संभाव्य धाेके लक्षात घेत जीएम बियाण्यांना बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी राज्यातील ७० पर्यावरणस्नेही संस्थांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जीएम बियाणे चाेरट्या मार्गाने शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविणाऱ्यांना पकडण्यात आले हाेते. यामध्ये मुख्यत्वे बीटी काॅटन व बीटी वांग्याची तस्करी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याची माहिती आहे. काेराेना आपत्तीचा फायदा घेत बांगलादेश व इतर देशांमधून भारतात आणून महाराष्ट्रासह इतर राज्यात तस्करी केली जाते. बीजाेत्सवच्या सदस्या व वनस्पती अभ्यासक प्राची माहूरकर यांनी सांगितले, राज्यातील काही माेठे व्यापारी गट या जीएम बियाण्यांच्या प्रसारात अग्रेसर आहेत. साेशल मीडियाचा वापर करून प्रसार केला जात आहे. भरघाेस उत्पादनाचे आमिष दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून शेतकऱ्यांना या बेकायदेशीर बियाण्यांची लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. बियाण्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसल्याने शेतकरी याला बळी पडत असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. शिवाय या बियाण्यांची खरेदी करताना पावती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन संबंधित यंत्रणांना या बेकायदेशीर तस्करीविराेधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी ७० संस्थांनी केली आहे.

हे बियाणे नपुंसक आणि खर्चिकही

प्राची माहूरकर यांनी सांगितले, जीएम वांग्याचे बियाणे नपुंसक असते. एकदा लागवड केल्यानंतर पुढच्या पेरणीसाठी त्या बियाण्यांचा वापर करता येत नाही. सुरुवातीला हे बियाणे शेतकऱ्यांना माेफतही दिले जाते पण एकदा सवय झाली की शेतकऱ्यांना ते खरेदी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यामुळे दरवर्षी बियाण्यांसाठी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय वातावरणाशी अनुकूल ठरले नाही तर पुन्हा तणनाशके, खतांचा खर्च करावा लागताे. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य बाजारावर अवलंबून हाेते.

देशात ९५० देसी वांग्यांच्या प्रजाती

आपल्या देशात ९५० च्यावर वांग्याच्या नाेंदणीकृत प्रजाती आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक हवामानानुसार हाेणाऱ्या आहेत. त्यामुळे चवीचेही वैविध्य राखले गेले आहे. जीएम बियाणे आले तर देसी बियाणे नष्ट हाेईल व चवीचे वैविध्य संपेल, अशी भीती माहूरकर यांनी व्यक्त केली.