शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जीएम वांग्याच्या बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना ...

नागपूर : जनुकीय परिवर्तीत (जीएम) बियाण्यांच्या लागवडीला सध्यातरी महाराष्ट्रात परवानगी नाही. मात्र तरीही जीएम बियाण्यांचा बेकायदेशीर वापर सर्रासपणे हाेताना दिसत आहे. अशाच मार्गाने कापसाच्या जीएम बियाण्यांचा प्रसार केल्यानंतर आता वांग्याच्या जीएम बियाण्यांची चाेरट्या मार्गाने घुसखाेरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या बियाण्यांमुळे भविष्यात पर्यावरणावरील संभाव्य धाेके लक्षात घेत जीएम बियाण्यांना बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याची मागणी राज्यातील ७० पर्यावरणस्नेही संस्थांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जीएम बियाणे चाेरट्या मार्गाने शेतकऱ्यांपर्यंत पाेहचविणाऱ्यांना पकडण्यात आले हाेते. यामध्ये मुख्यत्वे बीटी काॅटन व बीटी वांग्याची तस्करी माेठ्या प्रमाणात हाेत असल्याची माहिती आहे. काेराेना आपत्तीचा फायदा घेत बांगलादेश व इतर देशांमधून भारतात आणून महाराष्ट्रासह इतर राज्यात तस्करी केली जाते. बीजाेत्सवच्या सदस्या व वनस्पती अभ्यासक प्राची माहूरकर यांनी सांगितले, राज्यातील काही माेठे व्यापारी गट या जीएम बियाण्यांच्या प्रसारात अग्रेसर आहेत. साेशल मीडियाचा वापर करून प्रसार केला जात आहे. भरघाेस उत्पादनाचे आमिष दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून शेतकऱ्यांना या बेकायदेशीर बियाण्यांची लागवड करण्यास भाग पाडले जात आहे. बियाण्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसल्याने शेतकरी याला बळी पडत असल्याचे माहूरकर यांनी सांगितले. शिवाय या बियाण्यांची खरेदी करताना पावती मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन संबंधित यंत्रणांना या बेकायदेशीर तस्करीविराेधात कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी ७० संस्थांनी केली आहे.

हे बियाणे नपुंसक आणि खर्चिकही

प्राची माहूरकर यांनी सांगितले, जीएम वांग्याचे बियाणे नपुंसक असते. एकदा लागवड केल्यानंतर पुढच्या पेरणीसाठी त्या बियाण्यांचा वापर करता येत नाही. सुरुवातीला हे बियाणे शेतकऱ्यांना माेफतही दिले जाते पण एकदा सवय झाली की शेतकऱ्यांना ते खरेदी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. यामुळे दरवर्षी बियाण्यांसाठी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. शिवाय वातावरणाशी अनुकूल ठरले नाही तर पुन्हा तणनाशके, खतांचा खर्च करावा लागताे. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य बाजारावर अवलंबून हाेते.

देशात ९५० देसी वांग्यांच्या प्रजाती

आपल्या देशात ९५० च्यावर वांग्याच्या नाेंदणीकृत प्रजाती आहेत. उल्लेखनीय म्हणजे प्रत्येक हवामानानुसार हाेणाऱ्या आहेत. त्यामुळे चवीचेही वैविध्य राखले गेले आहे. जीएम बियाणे आले तर देसी बियाणे नष्ट हाेईल व चवीचे वैविध्य संपेल, अशी भीती माहूरकर यांनी व्यक्त केली.