शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गरजू वकिलांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत द्या : हायकोर्टात जनहित याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 00:27 IST

लॉकडाऊनमुळे राज्यातील हजारो वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू वकिलांना बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा यांनी प्रत्येकी १० हजार रुपये वाटप करावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे वकिलांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यातील हजारो वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू वकिलांना बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा यांनी प्रत्येकी १० हजार रुपये वाटप करावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.खामगाव येथील अ‍ॅड. आरिफ शेख दाऊद यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सावधगिरी म्हणून सर्वप्रकारच्या न्यायालयांमध्ये केवळ अत्यावश्यक प्रकरणे ऐकली जात आहेत. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वकिलांना काम मिळणे बंद झाले आहे. राज्यातील हजारो वकील रोजच्या कमाईवर अवलंबून आहेत. ते किरकोळ कामे करून पोटापुरते पैसे मिळवतात. त्यात नवोदितांपासून ते ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे कमाई बंद झाल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियावर देशातील तर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवावर राज्यातील सर्व वकिलांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी वकिलांची मदत करायला पाहिजे. बार कौन्सिल ऑफ इंडिया रुल्समध्ये वकिलांच्या मदतीकरिता निधी उभारण्याची व गरजेच्या वेळी तो निधी वकिलांना वितरित करण्याची तरतूद आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.बार कौन्सिलना उत्तर मागितलेया प्रकरणावर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने बार कौन्सिल ऑफ इंडिया, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांना नोटीस बजावून याचिकेवर ५ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.‘लोकमत’ने वेधले होते लक्षलॉकडाऊनमुळे अनेक वकील आर्थिक अडचणीत सापडल्याचे व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. तसेच, या वकिलांना आर्थिक मदत करणे आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर वकिलांच्या मदतीकरिता अनेक जण पुढे आले होते. आता ही याचिका दाखल झाली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल