शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

आरक्षण द्या, अन्यथा मंत्र्यांना ओबीसी रस्त्यांवर फिरू देणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपने ...

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुढे ढकलता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर भाजपने परत महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी केवळ बैठकाच घेतल्या व प्रत्यक्ष पावले उचललीच नाही. त्यामुळे ही वेळ आली आहे. तीन महिन्यांत आरक्षण दिले नाही तर ओबीसी समाज मंत्र्यांना रस्त्यांवरून फिरू देणार नाही व भाजपदेखील राज्यपातळीवर तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. रविवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणूका घ्याव्या लागतात; पण राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलू असे म्हणत राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठका घेऊन वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला असल्याने आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे; पण आताही तीन महिन्यांत इम्पेरीकल डाटा गोळा करून, ओबीसींना आरक्षण देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावी. असे झाले नाही तर पुढील स्थितीला राज्य शासन जबाबदार असेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.