शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

‘त्या’ दहा कुटुंबांना भूखंड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:08 IST

भिवापूर : पुनर्वसनात भूखंड न मिळाल्याने १२ वर्षांपासून टिनाच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांचे छत हिरावून घेण्याचे कारस्थान व्हीआयडीसीने चालविले. ‘लोकमत’च्या ...

भिवापूर : पुनर्वसनात भूखंड न मिळाल्याने १२ वर्षांपासून टिनाच्या शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांचे छत हिरावून घेण्याचे कारस्थान व्हीआयडीसीने चालविले. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली. त्यामुळे शेड काढण्याची प्रक्रिया कदाचित स्थगित होईल. मात्र, कधी ना कधी हे शेड व्हीआयडीसी काढणार आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था नको तर कायमस्वरूपी उपाय करा. गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनातील ‘त्या’ दहा कुटुंबांना भूखंड द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. वैनगंगेच्या खोऱ्यात निमार्णाधिन गोसेखुर्द प्रकल्पाला ४० वर्षांहून अधिक कालखंड झाला. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील असंख्य गावे पाण्याखाली आली. यात भिवापूर तालुक्यातील सालेशहरी, सालेभट्टी, गोहल्ली, नांदीखेळा, पांजरेपार, गाडेघाट, घाटउमरी, थुटानबोरी, मोखेबर्डी, किटाळी, किन्ही (कला), किन्ही (खुर्द), नागतरोली, सावरगाव, नेरी, मरूपार, शेगाव, अड्याळ या १८ गावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन करण्यात व्हीआयडीसीला यश आले नाही. जाचक अटी व नियम, कागदी घोड्यांचा बाजार आणि घुमवाघुमवी आदी कारणांमुळे कित्येक प्रकल्पग्रस्ताला पुनर्वसनात भूखंड मिळाला नाही. याच कारणामुळे गाडेघाट व घाटउमरी पुनर्वसनात टिनाच्या शेडमध्ये १० कुटुंबे तब्बल १२ वर्षांपासून मुक्कामी आहेत. अशातच हे टिनाचे शेड काढण्याचे कारस्थान व्हीआयडीसीने चालविले. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारी ‘प्रकल्पग्रस्तांच्या निराधार मुलींचे संसार उघड्यावर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत माजी आ. सुधीर पारवे यांनी जिल्हाधिकारी व व्हीआयडीसीच्या संबंधितांशी पत्रव्यवहार करत गाडेघाट, घाटउमरी पुनर्वसनात मुक्कामी असलेल्या ‘त्या’ कुटुंबीयांचे टिनाचे शेड काढू नये, शिवाय त्यांना तत्काळ भूखंड वितरीत करावे, अशी मागणी केली. ग्रामपंचायतीनेसुध्दा व्हीआयडीसीला पत्र देत सदर शेड न काढण्याची विनंती केली आहे.

व्हीआयडीसीचे शेड कायम राहणार?

शासनाच्या परिपत्रकानुसार जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ पावसाचा असल्याने यादरम्यान कोणत्याही व्यक्तिला निवाऱ्यापासून दूर करता येत नाही. या परिपत्रकाचा व्हीआयडीसीला कदाचित विसर पडलेला आहे. त्यामुळे या परिपत्रकाची जाणीव करून दिल्यास व्हीआयडीसी सदर शेड काढणार नाही.

---

याबाबत संबंधीत पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात कुणाचा निवारा निष्काषित करता येत नाही.

- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार, भिवापूर

----

व्हीआयडीसीची कार्यप्रणाली चुकीची आहे. कित्येक प्रकल्पग्रस्ताला भूखंड मिळालेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी मी आंदोलन केले. तेव्हा पुनर्वसित गाव हस्तांतरीत झाल्याचे व्हीआयडीसीने सांगितले. मग, ग्रामपंचायतीला न विचारता टिनाचे शेड काढण्यास सुरूवात कशी काय केली?

-रोशन गायधने, उपसरपंच, मोखाबर्डी ग्रामपंचायत.

===Photopath===

030621\photo 1.jpg

===Caption===

भूखंडाअभावी १२ वर्षापासून टिणाच्या शेड मध्ये मुक्कामी असलेले गाडेघाट, घाटउमरी येथील पिडीत कुटूंबिय