शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

पॅकेजची रक्कम आठ दिवसात शेतकऱ्यांना द्या

By admin | Updated: February 3, 2015 00:58 IST

दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात सात हजार कोटीच्या पॅकेजची केलेली

विदर्भ कनेक्टची मागणी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारही अपयशीनागपूर : दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात सात हजार कोटीच्या पॅकेजची केलेली घोषणा पोकळ ठरत आहे. राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहे. राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न बघता येत्या आठ दिवसात संपूर्ण घोषित केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या दारात पोहचवावी, अशी मागणी विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी केली आहे. राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतक ऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याबाबत कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. नवे सरकारही शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत असेल तर सरकारच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. आज ते स्वत: मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होऊन दोन महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी एकही कल्याणकारी योजना त्यांनी आखली नाही. अधिवेशनात केलेल्या पॅकेजची घोषणाही पोकळ ठरत आहे. कापूस आणि सोयाबीनला जाहीर केलेल्या भावात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिक ट झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तत्परता दाखवावी, आठ दिवसात पॅकेज शेतकऱ्यांच्या दारात पोहचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना विशेष अधिकारी नेमून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामावर लावून विदर्भातील नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा द्यावा.(प्रतिनिधी)