शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

महाराष्ट्राला सोडून बिहारला ‘पॅकेज’ का दिले?

By admin | Updated: October 12, 2015 02:53 IST

महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

संजय निरुपम : उत्तर भारतीय सभेचे वार्षिक अधिवेशन नागपूर : महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. महाराष्ट्रातील बळीराजाला दिलासा देण्याची गरज असताना केंद्र शासनाने बिहारला कसे काय विशेष ‘पॅकेज’ दिले, असा प्रश्न उपस्थित करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केंद्र सरकारवर टीका केली. कस्तुरचंद पार्क येथे उत्तर भारतीय सभेच्या वार्षिक अधिवेशनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाला छत्तीसगड येथील खासदार ताम्रध्वज साहू, प्रसिद्ध गायिका मालिनी अवस्थी, छत्तीसगडमधील अभिनेते ‘राजा छत्तीसगडिया’ ऊर्फ अनुज शर्मा, ज्येष्ठ पत्रकार सुमित अवस्थी, नरेंद्र शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यासाठी विशेष ‘पॅकेज’ द्यायला हवे होते. परंतु असे न करता राज्य शासनाने दुष्काळ कराच्या नावाखाली इंधनावर कर लावला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत किती जिल्हे दुष्काळप्रभावित आहेत याची घोषणा शासनाने केलेली नाही, असे निरुपम म्हणाले. उत्तर भारतीय सभेचे काम राजकीय नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक आहे. उत्तर भारतीयांच्या सन्मानाची जपणूक करत असतानाच इतर भाषिक नागरिकांनाही योग्य मान दिला जातो. परंतु काही लोकांकडून भाषेच्या नावाखाली राजकारण करण्यात येते. सर्व भाषांचा सन्मान होणे आवश्यक आहे. परंतु जर कोणी भाषा, प्रांत, जात यांच्या नावाखाली एकता तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रत्युत्तर द्यायलाच हवे असे आवाहन निरुपम यांनी उपस्थितांना केले. यावेळी दंदे फाऊंडेशनचे संचालक अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, ज्येष्ठ पत्रकार संजय तिवारी, निवृत्त पोलीस अधिकारी रामलखन यादव, समाजसेवक पुरुषोत्तम लोणारे, राधेश्याम सारडा, शैलेश अवस्थी, अ‍ॅड. सुरेश शुक्ला, डॉ. हरविंदर गांधी, उमेश शाहू, जफर अहमद खान, गुणवंत विद्यार्थी कमल शाहू, मनोज पांडे, उमेश शाहू यांचा समाजगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उत्तर भारतीय सभेचे विदर्भ अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले व विदर्भातील सभेच्या कार्याची माहिती दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सभेतर्फे जिल्हाधिकारी कोषात ५१ हजार रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. मालिनी अवस्थी व अनुज शर्मा यांनीही आपल्या कलेचे सादरीकरण केले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.(प्रतिनिधी)