शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

गतिमंद मुलांना हक्काचे घर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:30 IST

गतिमंद मुलांना हक्काचे घर मिळण्यासाठी स्वीकार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : शासन व महानगरपालिकेला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गतिमंद मुलांना हक्काचे घर मिळण्यासाठी स्वीकार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही गतिमंद मुलांच्या पालकांची संघटना आहे.पालकांच्या मृत्यूनंतर गतिमंद मुले रस्त्यावर येऊ नये व त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी संघटनेने शैक्षणिक व कौशल्य विकास केंद्र्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अशाप्रकारचा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे.त्यासाठी संघटनेला चिंचभुवन येथे १० हजार चौरस फूट जमीन देण्यात आली आहे. या जमिनीवरील इमारत आराखड्यात मंजुरी मिळण्यासाठी संघटनेने २००५ मध्ये मनपाला अर्ज दिला, पण त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे.पोहोच रस्ता उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अर्ज प्रलंबित ठेवणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.न्यायालयाने नगरविकास विभागाचे सचिव, मनपा आयुक्त, मनपाच्या नगर विकास विभागाचे सहाय्यक संचालक व यूएलसीचे सक्षम अधिकारी यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वीकारतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.१९ वर्षांपासून रखडला प्रकल्पसंघटनेचा प्रकल्प १९ वर्षांपासून रखडला आहे. सुरुवातीला ७ लाख ५० हजार रुपये जमा केल्यानंतरही संघटनेला जमिनीचा ताबा देण्यात आला नाही. यानंतर संघटनेला परत सहा लाख जमा करण्यास सांगण्यात आले. ही रक्कमही जमा करण्यात आली आहे. परंतु, यूएलसी जमिनीच्या अवैध वाटपाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे संघटनेला दिलासा मिळाला नाही.