शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

गतिमंद मुलांना हक्काचे घर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:30 IST

गतिमंद मुलांना हक्काचे घर मिळण्यासाठी स्वीकार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : शासन व महानगरपालिकेला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गतिमंद मुलांना हक्काचे घर मिळण्यासाठी स्वीकार संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ही गतिमंद मुलांच्या पालकांची संघटना आहे.पालकांच्या मृत्यूनंतर गतिमंद मुले रस्त्यावर येऊ नये व त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी संघटनेने शैक्षणिक व कौशल्य विकास केंद्र्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अशाप्रकारचा विदर्भातील एकमेव प्रकल्प आहे.त्यासाठी संघटनेला चिंचभुवन येथे १० हजार चौरस फूट जमीन देण्यात आली आहे. या जमिनीवरील इमारत आराखड्यात मंजुरी मिळण्यासाठी संघटनेने २००५ मध्ये मनपाला अर्ज दिला, पण त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी संघटनेने न्यायालयात धाव घेतली आहे.पोहोच रस्ता उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अर्ज प्रलंबित ठेवणे चुकीचे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.न्यायालयाने नगरविकास विभागाचे सचिव, मनपा आयुक्त, मनपाच्या नगर विकास विभागाचे सहाय्यक संचालक व यूएलसीचे सक्षम अधिकारी यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वीकारतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.१९ वर्षांपासून रखडला प्रकल्पसंघटनेचा प्रकल्प १९ वर्षांपासून रखडला आहे. सुरुवातीला ७ लाख ५० हजार रुपये जमा केल्यानंतरही संघटनेला जमिनीचा ताबा देण्यात आला नाही. यानंतर संघटनेला परत सहा लाख जमा करण्यास सांगण्यात आले. ही रक्कमही जमा करण्यात आली आहे. परंतु, यूएलसी जमिनीच्या अवैध वाटपाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे संघटनेला दिलासा मिळाला नाही.