शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या

By admin | Updated: March 20, 2017 02:03 IST

राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कर्जाचा डोंगर त्यांच्यावर आहे. बियाणे

ओबीसी महासंघाच्या बैठकीत ठराव : ७ आॅगस्टला दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर : राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. कर्जाचा डोंगर त्यांच्यावर आहे. बियाणे, खते, अवजारे यांच्या किमती वाढलेल्या असताना शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. मुलांचे लग्न, शिक्षण, कर्ज यात गुरफटलेला शेतकरी आत्महत्येकडे वळला आहे. एकीकडे उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे. मात्र अन्नदात्याला जिवंत ठेवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाही. रविवारी पार पडलेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असा ठराव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी न केल्यास महासंघ रस्त्यावर उतरणार असल्याचे महासंघाचे राष्ट्रीय संयोजक बबनराव तायवाडे यांनी सांगितले. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेत धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. बैठकीला माजी खासदार खुशाल बोपचे, अशोक जीवतोडे, सुषमा भड, प्रवीण गायकवाड, सचिन राजूरकर, शरद वानखडे, विनोद उल्लीपवार, अवंतिका लेकुरवाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत खासदार सीताराम येचुरी यांच्या व्याख्यानाला विद्यापीठाने नाकार दिल्याने बैठकीत कुलगुरूंच्या निषेधाचा ठराव करण्यात आला. येणाऱ्या ७ आॅगस्टला महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. हिवाळी अधिवेशनावर महासंघाने काढलेल्या मोर्चामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊन ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करून त्यात २,३८४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता ओबीसी आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी महासंघाची व्याप्ती राष्ट्रीयस्तरावर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन तायवाडे यांनी केले. त्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये संघटनेची बांधणी करणे, गावागावात महासंघाचे पदाधिकारी तयार करणे, वकील, सरकारी कर्मचारी यांना संघटनेशी जुळवून घेणे. मेळावे, अधिवेशन, बैठकांचे सातत्याने आयोजन करणे आदींवर जास्तीत जास्त भर देण्याचे बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)