शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

गरजेनुसारच कर्जमाफी द्या

By admin | Updated: September 25, 2015 03:38 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी.

शरद पवार : शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी. परंतु सरसकट कर्जमाफीची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पवार यांनी शेतकरी आत्महत्यासह विविध मुद्यावर पत्रकारांशी चर्चा केली. मागील काही वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी प्रामुख्याने आत्महत्या करतात. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणा व भांडवलाचा अभाव आदी कारणे आहेत. आत्महत्येची समस्या विदर्भ व मराठवाड्यातच नाही तर ९४ टक्के सिंचन सुविधा असलेल्या पंजाब, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदी राज्यातही आहे. किल्लारी भूकंपाच्यावेळी लोकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांची मदत घेतली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आत्महत्या मागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी निकष आहे. परंतु अनेक प्रकरणात शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मदतीसाठी पात्र धरले जात नसल्याने निकषात सुधारणा करणाची गरज आहे. ६० वर्षापूर्वी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आज ती १२५ कोटीवर गेली आहे. शेतीखालील जमीन मात्र कमी झाली आहे. असे असतानाही ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहे. जमिनीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. शेतीवर कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला अतिरिक्त भार कमी करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)सिंचन घोटाळ््याची चौकशी न्यायपूर्ण नाहीराज्यातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारमार्फ त सुरू असलेली चौकशी न्यायपूर्ण नाही. अशा प्रकारच्या मार्गाचा यापूर्वी कधी वापर केला नाही. दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असतानाही माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप लावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारशेतकरी आत्महत्या व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांना मदत मिळावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. यासाठी पंतप्रधानांची वेळ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.