शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गरजेनुसारच कर्जमाफी द्या

By admin | Updated: September 25, 2015 03:38 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी.

शरद पवार : शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी. परंतु सरसकट कर्जमाफीची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पवार यांनी शेतकरी आत्महत्यासह विविध मुद्यावर पत्रकारांशी चर्चा केली. मागील काही वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी प्रामुख्याने आत्महत्या करतात. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणा व भांडवलाचा अभाव आदी कारणे आहेत. आत्महत्येची समस्या विदर्भ व मराठवाड्यातच नाही तर ९४ टक्के सिंचन सुविधा असलेल्या पंजाब, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदी राज्यातही आहे. किल्लारी भूकंपाच्यावेळी लोकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांची मदत घेतली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आत्महत्या मागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी निकष आहे. परंतु अनेक प्रकरणात शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मदतीसाठी पात्र धरले जात नसल्याने निकषात सुधारणा करणाची गरज आहे. ६० वर्षापूर्वी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आज ती १२५ कोटीवर गेली आहे. शेतीखालील जमीन मात्र कमी झाली आहे. असे असतानाही ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहे. जमिनीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. शेतीवर कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला अतिरिक्त भार कमी करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)सिंचन घोटाळ््याची चौकशी न्यायपूर्ण नाहीराज्यातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारमार्फ त सुरू असलेली चौकशी न्यायपूर्ण नाही. अशा प्रकारच्या मार्गाचा यापूर्वी कधी वापर केला नाही. दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असतानाही माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप लावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारशेतकरी आत्महत्या व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांना मदत मिळावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. यासाठी पंतप्रधानांची वेळ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.