शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

गरजेनुसारच कर्जमाफी द्या

By admin | Updated: September 25, 2015 03:38 IST

राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी.

शरद पवार : शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त जिल्ह्यातील त्या-त्या भागातील परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना गरज असेल तेथेच कर्जमाफी देण्यात यावी. परंतु सरसकट कर्जमाफीची गरज नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.नागपूर श्रमिक पत्रकार संघ व टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे आयोजित मिट द प्रेस कार्यक्रमात पवार यांनी शेतकरी आत्महत्यासह विविध मुद्यावर पत्रकारांशी चर्चा केली. मागील काही वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी प्रामुख्याने आत्महत्या करतात. यामागे नापिकी, कर्जबाजारीपणा व भांडवलाचा अभाव आदी कारणे आहेत. आत्महत्येची समस्या विदर्भ व मराठवाड्यातच नाही तर ९४ टक्के सिंचन सुविधा असलेल्या पंजाब, आंध्रप्रदेश व कर्नाटक आदी राज्यातही आहे. किल्लारी भूकंपाच्यावेळी लोकांना या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी डॉ. मोहन आगाशे यांची मदत घेतली होती. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आत्महत्या मागील कारणांचा तज्ज्ञांच्या माध्यमातून शोध घेण्याची गरज आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी निकष आहे. परंतु अनेक प्रकरणात शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसते. त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मदतीसाठी पात्र धरले जात नसल्याने निकषात सुधारणा करणाची गरज आहे. ६० वर्षापूर्वी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आज ती १२५ कोटीवर गेली आहे. शेतीखालील जमीन मात्र कमी झाली आहे. असे असतानाही ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहे. जमिनीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. शेतीवर कुटुंबातील सदस्यांचा वाढलेला अतिरिक्त भार कमी करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हा (ग्रामीण) चे अध्यक्ष रमेश बंग, आमदार प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)सिंचन घोटाळ््याची चौकशी न्यायपूर्ण नाहीराज्यातील सिंचन घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारमार्फ त सुरू असलेली चौकशी न्यायपूर्ण नाही. अशा प्रकारच्या मार्गाचा यापूर्वी कधी वापर केला नाही. दिल्लीत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. असे असतानाही माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप लावण्यात आल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारशेतकरी आत्महत्या व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांना मदत मिळावी. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. यासाठी पंतप्रधानांची वेळ घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.