शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

घाटंजीला पुन्हा अंधश्रध्देचा डंख

By admin | Updated: May 7, 2014 14:05 IST

यवतमाळ सपना पळसकरच्या नरबळीने शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला.

संतोष अरसोड 

यवतमाळ सपना पळसकरच्या नरबळीने शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदारसंघात पुन्हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला. महिलेच्या अंगातील भूत काढण्यासाठी चक्क स्मशानात अन् तेही पुरलेल्या प्रेताच्या साक्षीने प्रकार सुरू होता. नागरिकांच्या सतर्कतेने मांत्रिकांना गजाआड व्हावे लागले. जादूटोणा विरोधी कायद्याचे ‘सत्य’रूप प्रत्यक्षात आणण्याचे क्रेडिट घेणाऱ्यांच्याच तालुक्यात वारंवार असे प्रकार का घडावेत हा चिंतनाचा नव्हे चिंतेचा विषय होऊ पाहत आहे. घाटंजीच्या घाटी स्मशानभूूमीत ११.३० वाजताच्या सुमारास सहा जण एका पुरलेल्या प्रेताजवळ अघोरी पूजा करताना लक्षात आले. बायकोला भूतबाधा झाल्याचा गैरसमज करून नवरोबानेच काही मांत्रिकांकरवी हा प्रकार केला. मात्र नागरिकांच्या दक्षतेमुळे चार आरोपी गजाआड झाले. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हाही दाखल झाला. पोलीस त्यांचे काम करतीलही. पण असे प्रकार आणखी किती दिवस चालणार?

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला. त्यापूर्वी सपना पळसकर नरबळी प्रकरणाने आमची मान शरमेने खाली गेली. घाटंजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. मोघे यांच्या मतदारसंघात येते. नरबळी प्रकरणाने व्यथित झालेल्या सामाजिक न्यायमंत्र्याना जादूटोणाविरोधी कायदा पास व्हावा, असे मनापासून वाटत होते, असे म्हणणे धाडसाचे होईल. डॉ. दाभोलकरांचा खून झाल्यानंतर लोकांचा रोष कमी व्हावा म्हणून विधेयक पास झाले. मोघे यांनी या कायद्याच्या मंजुरीचे पुरोगामी स्टाईलने क्रेडिट घेतले. मात्र त्यांच्याच मतदारसंघात कायद्याची सामाजिक व मानवीय बाजूू पटवून देण्यात मोघे यांना अपयश आल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. सामाजिक न्यायमंत्री म्हणून अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांच्यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे. सपना पळसकर प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा स्मशानात अघोरी प्रकार घडावेत, याची नैतिक जबाबदारी कुणाची आहे. सर्वांनाच आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

सपना पळसकर नरबळी प्रकरणाने घाटंजी तालुक्याची नकारात्मक महिमा सार्‍या महाराष्ट्रभर पोहोचली. कळंब येथील बाबाच्या नादी लागल्याने एका अभियंत्याला आपल्या बायकोचा जीव गमवावा लागला. त्यानंतर वणी तालुक्यातील बोर्डा येथे करणीच्या संशयावरून मानवी विष्ठा चारण्याचा घृणास्पद प्रकार घडला. एक दोन महिने झाले की जिल्ह्यात अंधश्रध्दांची बजबजपुरी माजल्याच्या निर्लज्ज घटना समोर येतात. काही घटनांची बोंब होत नाही. एकंदरीत कायदे करा की काही करा आम्ही आमच्या नालायकीवर कायम आहोत, हे सांगण्याची धडपड मात्र कायम असते.