शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘खाऊ गल्ली’ की गर्दुल्यांचा अड्डा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:39 IST

शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे.

ठळक मुद्दे७२ लाखांचा प्रकल्प धूळखात े स्थळांची निवड कागदावरच े कशी होणार वाहतूक सुरळीत

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे. सोबतच या प्रकल्पामुळे गांधीसागरच्या सौंदर्यात भर पडली आहे. बिकट आर्थिक परिस्थितीत या प्रकल्पावर ७२ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु खाऊ गल्ली वर्षभरापासून वापराविना पडून असल्याने येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी हा गर्दूल्यांचा अड्डा बनला आहे.नागपूर शहरातील बाजारपेठेत रस्त्यांच्या कडेला फूटपाथच्या जागेवर चाटचे ठेले उभे राहातात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. ठेलेवाल्यांना महापालिकेच्या बाजारपेठेजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर सुविधा उपलब्ध करून त्यांना प्रस्थापित करण्याची संकल्पना साकार करण्यासाठी ‘खाऊ गल्ली’ निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने दोन वर्षापूर्वी घेतला होता. प्रकल्पाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. मात्र अद्याप निविदा काढण्यात आलेल्या नाही.गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने खाऊ गल्ली प्रकल्प राबविण्याचा संकल्प स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बंडू राऊ त यांनी केला होता. त्यांच्या कार्यकाळात तलावाच्या काठावर २७ स्टॉलचे बांधकाम करण्यात आले. कारंजे लावण्यात आले. बसण्यासाठी ओटे, शेड उभारण्यात आले. पथदिवे व वृक्षारोपण करून आजूबाजूच्या परिसराचे सौंदयीकरण करण्यात आले. खाऊ गल्ली प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना सुविधा होण्यासोबतच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याचा हेतू होता. गांधीसागर येथील प्रकल्प यशस्वी ठरला तर शहराच्या इतर भागातही हा प्रकल्प राबविला जाणार होता. यामुळे शहरातील अतिक्रमणालाही काही प्रमाणात आळा बसण्याला मदत होणार होती. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने खाऊ गल्ली धूळखात पडून आहे.अंबाझरी फ्लो पॉर्इंट येथील प्रकल्प रखडलागांधीसागर येथील खाऊ गल्लीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरात उपलब्ध असलेल्या सार्वजनिक जागांवर हा प्रकल्प राबविला जाणार होता. यात स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्यात आलेल्या अंबाझरी फ्लो पॉर्इंटचाही समावेश होता. परंतु गांधीसागर येथील प्रकल्प धूळखात असल्याने तूर्त हा प्रकल्प रखडला आहे.-तर कसे वाढणार उत्पन्नबिकट आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निविदासाठी एक-एक वर्ष रखडत असेल तर महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार नाही. संबंधित अधिकाºयांवर कठोर कारवाई झाली तरच काही प्रमाणात शिस्त लागण्याची आशा आहे.