शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

सत्य लपवून जामीन मिळवणे आरोपीला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:32 IST

Nagpur News खून प्रकरणातील एका आरोपीला सत्य लपवून जामीन मिळवणे महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपीवर ५० हजार रुपये दावा बसवला.

ठळक मुद्दे ५० हजार रुपये दावा खर्च बसवला

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : खून प्रकरणातील एका आरोपीला सत्य लपवून जामीन मिळवणे महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपीवर ५० हजार रुपये दावा बसवला. तसेच, त्या आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलालाही फटकारले व न्यायालयाप्रतिच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

शुभम ऊर्फ भय्यालाल सोनी (२२) असे आराेपीचे नाव असून तो शांतिनगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा दणका दिला. आरोपीला संबंधित रक्कम १५ दिवसांत उच्च न्यायालय विधी सेवा उप-समितीकडे जमा करायची आहे. या आदेशाचे पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्कम थकगत जमीन महसूल म्हणून वसुल करावी असे निर्देश न्यायालयाने दिले.

निखिल लोखंडे यांच्या खून प्रकरणात कळमना पोलिसांनी साेनीसह इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सुरुवातीला सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी २० जून २०२० रोजी सोनीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. सोनी हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे सहा खटले प्रलंबित आहेत. या खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही असे परखड निरीक्षण या निर्णयात नोंदवण्यात आले होते. त्यानंतर सत्र न्यायाधिशांकडील कामकाजाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला. आरोपीने याचा फायदा घेण्यासाठी दोनच दिवसांनी दुसरा जामीन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांच्या निर्णयाची प्रत जोडली नाही. केवळ हा दुसरा जामीन अर्ज असल्याचे नमूद केले. तो अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. डी. इंगळे यांनी रेकॉर्डवरील पुरावे पाहता २४ जून २०२० रोजी मंजूर केला. पुढे त्या निर्णयावर फिर्यादीने आक्षेप घेतल्यामुळे सरकारने सोनीचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. परिणामी, न्या. व्ही. डी. इंगळे यांनी २९ ऑगस्ट २०२० रोजी सोनीचा जामीन रद्द केला. त्या निर्णयाविरुद्ध सोनीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.

न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवणे सर्वांची जबाबदारी

न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे ही न्यायाधीश, वकील, पक्षकार व सामान्य नागरिक या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. परंतु, या जबाबदारीचा अनेकदा विसर पडत असल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय