शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सत्य लपवून जामीन मिळवणे आरोपीला पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 11:32 IST

Nagpur News खून प्रकरणातील एका आरोपीला सत्य लपवून जामीन मिळवणे महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपीवर ५० हजार रुपये दावा बसवला.

ठळक मुद्दे ५० हजार रुपये दावा खर्च बसवला

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : खून प्रकरणातील एका आरोपीला सत्य लपवून जामीन मिळवणे महागात पडले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संबंधित आरोपीवर ५० हजार रुपये दावा बसवला. तसेच, त्या आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलालाही फटकारले व न्यायालयाप्रतिच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

शुभम ऊर्फ भय्यालाल सोनी (२२) असे आराेपीचे नाव असून तो शांतिनगर येथील रहिवासी आहे. त्याला न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा दणका दिला. आरोपीला संबंधित रक्कम १५ दिवसांत उच्च न्यायालय विधी सेवा उप-समितीकडे जमा करायची आहे. या आदेशाचे पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्कम थकगत जमीन महसूल म्हणून वसुल करावी असे निर्देश न्यायालयाने दिले.

निखिल लोखंडे यांच्या खून प्रकरणात कळमना पोलिसांनी साेनीसह इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. सुरुवातीला सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी २० जून २०२० रोजी सोनीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. सोनी हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे सहा खटले प्रलंबित आहेत. या खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे आहेत. त्यामुळे त्याला जामीन देता येणार नाही असे परखड निरीक्षण या निर्णयात नोंदवण्यात आले होते. त्यानंतर सत्र न्यायाधिशांकडील कामकाजाच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाला. आरोपीने याचा फायदा घेण्यासाठी दोनच दिवसांनी दुसरा जामीन अर्ज दाखल केला. त्या अर्जासोबत सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांच्या निर्णयाची प्रत जोडली नाही. केवळ हा दुसरा जामीन अर्ज असल्याचे नमूद केले. तो अर्ज सत्र न्यायाधीश व्ही. डी. इंगळे यांनी रेकॉर्डवरील पुरावे पाहता २४ जून २०२० रोजी मंजूर केला. पुढे त्या निर्णयावर फिर्यादीने आक्षेप घेतल्यामुळे सरकारने सोनीचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. परिणामी, न्या. व्ही. डी. इंगळे यांनी २९ ऑगस्ट २०२० रोजी सोनीचा जामीन रद्द केला. त्या निर्णयाविरुद्ध सोनीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.

न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवणे सर्वांची जबाबदारी

न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे ही न्यायाधीश, वकील, पक्षकार व सामान्य नागरिक या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. परंतु, या जबाबदारीचा अनेकदा विसर पडत असल्यामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय