शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

भूमाफियांपासून मुक्ती द्या

By admin | Updated: May 25, 2017 01:58 IST

शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे.

संविधान चौकात धरणे : शेकडो लोकांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात निव्वळ एकच ग्वालबन्सी भूमाफिया नसून, अनेक भूमाफियांकडून आजही लोकांची फसवणूक सुरू आहे. गेल्या १० वर्षात विकसित होत असलेल्या नागपूरमुळे भूमाफियांच्या टोळ्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. भूमाफियांनी गुंडगिरी करून शेकडो एकर जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केले आहे. त्यात गरीब, निरपराध लोक भूमाफियांचे बळी पडले आहेत. कुठलीही शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पीडितांना न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. शहरातील भूमाफियांपासून पीडित असलेल्या नागरिकांनी भूमाफिया पीडित जनआंदोलन उभारून संविधान चौकात धरणे दिले. आंदोलकांनी शासनाकडे मागणी केली आहे की, भूमाफियांवर अंकुश ठेवण्यासाठी आंध्र प्रदेशातील लॅण्डग्रेविंग कायदा १९८२ महाराष्ट्र शासनानेही लागू करावा. पीडितांतर्फे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता, पोलीस आर्थिक फसवणूक झाल्यानंतरही अदखलपात्र गुन्हा नोंदवून भूखंडावर बेकायदेशीर कब्जा करणाऱ्यांवर काहीच कारवाई करीत नाही. पोलिसांद्वारे पीडितांना सरळ न्याय मिळावा अशी प्रशासकीय व्यवस्था करण्यात यावी. नागपूर शहर व ग्रामीणमध्ये पी.यू. लॅण्डच्या नावाने लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक व भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात येत आहे. यावर स्वतंत्रपणे निवृत्त न्यायाधीशामार्फत समितीचे गठण करून पी.यू.च्या सर्व जमिनी पुन्हा नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ प्रशासनाने ताब्यात घेऊन दोषींवर कारवाई करावी. भूमाफिया ग्वालबन्सी प्रकरणात गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीला स्थायी स्वरूप द्यावे. आरक्षित केलेल्या परिसिमन जमिनीची माहिती नगर रचना विभागाने लिखित स्वरूपात फलकांवर प्रसिद्ध करून त्याची आराजी व त्याचा उपयोग जनतेसमोर माहितीसाठी करण्यात यावा. गेल्या सात वर्षात नागपूरमध्ये जमिनीच्या वादातून अनेकांची हत्या झालेली आहे. अनेक भूमाफिया राजकीय क्षेत्रात सर्रासपणे वावरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. भूमाफिया पीडित जनआंदोलनाचे अध्यक्ष दिलीप नरवडिया, कार्याध्यक्ष रवी गाडगे पाटील, सचिव ज्ञानेश्वर गुरव, नरेश निमजे यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुकुंद घाटे, निखिल गांधी, लजित चौरिया, अशोक देशमुख, राम माकडे, सुनील खंडेलवाल, मुन्ना महाजन, राजेश जाधव, सुभाष ढबाले, राजेश श्रीवास्तव अश्वजित पाटील, महेश मामीडवार, मनोज मालविया, भगवानदास राठी, दुर्योधन निंबर्ते, मनोज अवचट आदी उपस्थित होते.