शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याला मिळावा राजाश्रय

By admin | Updated: December 4, 2015 03:08 IST

नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या बैलबंडी मोर्चाने वेधले लक्ष : संत्रा व कापसाला योग्य भाव द्यानागपूर : नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोयाबीनचे उत्पादन घटले आणि कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढला. तब्बल १२५ किमी बैलबंडी व पायी चालत ते गुरुवारी नागपुरात पोहोचले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सायंकाळी रविभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत मोर्चाचा समारोप केला.काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी काटोलमधील बंद पडलेला संत्रा कारखाना सुरू करावा, किंवा शेतकऱ्यांनाच चालवायला द्यावा, सर्वंकष पीक योजना सर्व पिकांसाठी लागू करावी, नुकसान भरपाईसह नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कापसाला ६,५०० रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहीर करावा. ग्रामीण भागात २४ तास ३ फेज वीज द्यावी, गाव तिथे तलाव ही योजना राबवावी, शेत तिथे रस्ता कार्यक्रम राबवावा, ग्रामीण भागात इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि शालेय पोषण आहारात संत्री व इतर फळांचा समावेश करावा, आदी मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता काटोल तालुक्यातील खंडाळा या गावाहून अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. नरखेड, मोवाड, जलालखेडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल, कोहळी, कळमेश्वर, ब्राह्मणी आदी मोठ्या गावांना भेटी देत हा मोर्चा नागपुरात दाखल झाला. दरम्यान प्रत्येक गावात मोर्चाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांसाठी भेटवस्तू म्हणून संत्रा, कापूस देण्यात आले. गुरुवारी मोर्चा नागपुरात पोहोचला. मोर्चेकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे होते. परंतु ते शहरात नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी मोर्चेकरी रविभवनातील त्यांच्या कॉटेजवर आले. ते ही नागपुरात नव्हते. तेव्हा पालकमंत्र्यांचे सचिवांना मोर्चेकऱ्यांनी मागणीचे निवेदन अणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू सोपविल्या. सचिव पोटे यांनी निवेदन आणि वस्तू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहाचवण्याचे आवासन दिले. शिष्टमंडळात बैलबंडी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्यासह शेखर खरपुरीया, संदीप पवार, मनीष हेलोंडे, अमिताभ पावडे, तेजस केणे, विजय इवनाते आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)