शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
4
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
5
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
6
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
7
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
8
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
9
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
10
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
11
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
12
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
13
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
14
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
15
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
16
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
17
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
18
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
19
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
20
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली

संत्र्याला मिळावा राजाश्रय

By admin | Updated: December 4, 2015 03:08 IST

नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या बैलबंडी मोर्चाने वेधले लक्ष : संत्रा व कापसाला योग्य भाव द्यानागपूर : नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोयाबीनचे उत्पादन घटले आणि कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढला. तब्बल १२५ किमी बैलबंडी व पायी चालत ते गुरुवारी नागपुरात पोहोचले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सायंकाळी रविभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत मोर्चाचा समारोप केला.काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी काटोलमधील बंद पडलेला संत्रा कारखाना सुरू करावा, किंवा शेतकऱ्यांनाच चालवायला द्यावा, सर्वंकष पीक योजना सर्व पिकांसाठी लागू करावी, नुकसान भरपाईसह नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कापसाला ६,५०० रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहीर करावा. ग्रामीण भागात २४ तास ३ फेज वीज द्यावी, गाव तिथे तलाव ही योजना राबवावी, शेत तिथे रस्ता कार्यक्रम राबवावा, ग्रामीण भागात इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि शालेय पोषण आहारात संत्री व इतर फळांचा समावेश करावा, आदी मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता काटोल तालुक्यातील खंडाळा या गावाहून अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. नरखेड, मोवाड, जलालखेडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल, कोहळी, कळमेश्वर, ब्राह्मणी आदी मोठ्या गावांना भेटी देत हा मोर्चा नागपुरात दाखल झाला. दरम्यान प्रत्येक गावात मोर्चाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांसाठी भेटवस्तू म्हणून संत्रा, कापूस देण्यात आले. गुरुवारी मोर्चा नागपुरात पोहोचला. मोर्चेकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे होते. परंतु ते शहरात नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी मोर्चेकरी रविभवनातील त्यांच्या कॉटेजवर आले. ते ही नागपुरात नव्हते. तेव्हा पालकमंत्र्यांचे सचिवांना मोर्चेकऱ्यांनी मागणीचे निवेदन अणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू सोपविल्या. सचिव पोटे यांनी निवेदन आणि वस्तू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहाचवण्याचे आवासन दिले. शिष्टमंडळात बैलबंडी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्यासह शेखर खरपुरीया, संदीप पवार, मनीष हेलोंडे, अमिताभ पावडे, तेजस केणे, विजय इवनाते आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)