शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याला मिळावा राजाश्रय

By admin | Updated: December 4, 2015 03:08 IST

नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या बैलबंडी मोर्चाने वेधले लक्ष : संत्रा व कापसाला योग्य भाव द्यानागपूर : नागपूर जिल्हा हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र संत्र्याला कवडीमोल भाव असल्याने संत्रा बाजारात विकण्याऐवजी शेतकरी तो रस्त्यावर फेकून देत असल्याचे चित्र आहे. सोबतच सोयाबीनचे उत्पादन घटले आणि कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी बैलबंडी मोर्चा काढला. तब्बल १२५ किमी बैलबंडी व पायी चालत ते गुरुवारी नागपुरात पोहोचले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने सायंकाळी रविभवनात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत मोर्चाचा समारोप केला.काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांसाठी काटोलमधील बंद पडलेला संत्रा कारखाना सुरू करावा, किंवा शेतकऱ्यांनाच चालवायला द्यावा, सर्वंकष पीक योजना सर्व पिकांसाठी लागू करावी, नुकसान भरपाईसह नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, कापसाला ६,५०० रुपये प्रति क्ंिवटल भाव जाहीर करावा. ग्रामीण भागात २४ तास ३ फेज वीज द्यावी, गाव तिथे तलाव ही योजना राबवावी, शेत तिथे रस्ता कार्यक्रम राबवावा, ग्रामीण भागात इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि शालेय पोषण आहारात संत्री व इतर फळांचा समावेश करावा, आदी मागण्यांसाठी २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता काटोल तालुक्यातील खंडाळा या गावाहून अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्या नेतृत्वात बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. नरखेड, मोवाड, जलालखेडा, भारसिंगी, पारडसिंगा, काटोल, कोहळी, कळमेश्वर, ब्राह्मणी आदी मोठ्या गावांना भेटी देत हा मोर्चा नागपुरात दाखल झाला. दरम्यान प्रत्येक गावात मोर्चाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांसाठी भेटवस्तू म्हणून संत्रा, कापूस देण्यात आले. गुरुवारी मोर्चा नागपुरात पोहोचला. मोर्चेकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायचे होते. परंतु ते शहरात नव्हते. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी मोर्चेकरी रविभवनातील त्यांच्या कॉटेजवर आले. ते ही नागपुरात नव्हते. तेव्हा पालकमंत्र्यांचे सचिवांना मोर्चेकऱ्यांनी मागणीचे निवेदन अणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भेटवस्तू सोपविल्या. सचिव पोटे यांनी निवेदन आणि वस्तू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहाचवण्याचे आवासन दिले. शिष्टमंडळात बैलबंडी मोर्चाचे संयोजक अ‍ॅड. नीलेश हेलोंडे यांच्यासह शेखर खरपुरीया, संदीप पवार, मनीष हेलोंडे, अमिताभ पावडे, तेजस केणे, विजय इवनाते आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)