शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

गांधीसागर तलाव परिसरातील गट्टू उखडले()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष : कंत्राटदाराला अभय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधीसागर तलावाचे ...

पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष : कंत्राटदाराला अभय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने केली जाते. यासाठी प्रभागाचे नगरसेवक व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलनेही केली; परंतु सौंदर्यीकरण तर दूरच, तलावाच्या बाजूला असलेल्या भाजप ग्रामीण कार्यालय ते खादी ग्रामोद्योग दरम्यानच्या फूटपाथवरील गट्टू निघाले आहेत. यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक व तलावातील मासोळ्यांना खाद्य टाकण्यासाठी येणाऱ्यांचा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे मनपातील वजनदार नेत्यांचा हा प्रभाग आहे. नागरिकांनी गट्टू लावण्याच्या कामाची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, कंत्राटदाराला राजकीय नेत्यांचे अभय असल्याने तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम होत नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. तलाव सौंदर्यीकरणाचा सर्वे करण्यासाठी मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे पथक अनेकदा या परिसरात फिरले. मात्र, उखडलेले गट्टू दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधितांना दिले नाही. मनपातील अधिकारी संबंधित कंत्राटदाराच्या दबावात असल्याने कोणतीही कारवाई होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

....

तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणावर अनेकदा निधी खर्च करण्यात आला; परंतु अजूनही तलावाची भिंत जागोजागी नादुरुस्त आहे. तलावाच्या काठावर विक्रेते बसतात. कचरा तलावात टाकला जातो. खाऊ गल्ली प्रकल्पावर ७२ लाख खर्च करण्यात आले; परंतु अद्याप हा प्रकल्प सुरू झाला नाही. उभारलेले डोम फाटत असल्याने हा निधी पाण्यात गेला आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

हुतात्मा स्मारकांकडे दुर्लक्ष

हुतात्मा स्मारकाच्या बांधकामावर १०लाख खर्च करण्यात आले; परंतु फरशा उखडल्या आहेत. चाचा नेहरू बालोद्यानात लहान मुलांची खेळणी नाहीत. जिम नादुरुस्त आहेत. वॉकिंग ट्रॅक नादुरुस्त झाले आहेत. यावरून नागरिकांना चालता येत नाही. याची मनपाने दुरुस्ती करावी, अशी मागणी राजेश कुंभलकर यांनी केली आहे. अशीच अवस्था पागे उद्यानाची आहे. येथील जिम नादुरुस्त असून साफसफाई होत नाही. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

...

असामाजिक तत्त्वाचा वावर

पागे उद्यान व चाचा नेहरू उद्यानात रात्रीच्या सुमारास असामाजिक तत्त्वाचा वावर असतो. दिवे बंद असल्याने रात्रीला अंधारात प्रेमीयुगुल जागोजागी बसून असतात. गणेशपेठ पोलिसांना लेखी तक्रार दिली, गस्तीची मागणी केली आहे; परंतु याची दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.