शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

गरिबांनी पुन्हा चुली पेटवायच्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 11:48 IST

चूलमुक्त घराची संकल्पना व महिलांच्या आरोग्याचे रक्षण अशा हेतूने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला सिलिंडरच्या वाढत्या किमतीने दणका दिला आहे.

ठळक मुद्दे९३१ रुपयांत पडतेय सिलिंडरसबसिडीही वेळेत मिळेना

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चूलमुक्त घराची संकल्पना व महिलांच्या आरोग्याचे रक्षण अशा हेतूने सुरू केलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला सिलिंडरच्या वाढत्या किमतीने दणका दिला आहे. पंतप्रधानांच्या स्वप्नातील या योजनेत गॅस कनेक्शन घेण्यासाठी १६०० रुपये सूट दिली असली तरी सिलिंडर खरेदी करण्यासाठी तब्बल ९३१ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गरिबांनी आता पुन्हा चुलीच पेटवायच्या का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देणाऱ्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेला दर महिन्यात सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे फटका बसला आहे. आठ हजार कोटी रुपये खर्च करून देशातील पाच कोटींपेक्षा जास्त महिलांना जोडणी दिल्याचा केंद्राचा दावा आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे आधीच त्रस्त असलेले गरीब, सामान्य सिलिंडरच्या महागड्या किमतीमुळे हवालदिल झाले आहेत. सप्टेंबरच्या तुलनेत सबसिडीचे घरगुती सिलिंडर ३ रुपयांनी वाढले आहे, पण प्रत्यक्षात सर्वांनाच प्रारंभी गॅस सिलिंडर ९३१ रुपयांत खरेदी करावे लागते. अर्थात महिन्याला तेवढी आर्र्थिक तरतूद करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात सरकारने सिलिंडरची किंमत ५९ रुपयांनी वाढविली आहे. ही वाढ पेट्रोलपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. या दरवाढीला नागरिक सरकारला दोष देत आहे.सरकारने दरवाढीवर नियंत्रण आणावेगॅसची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत होत असते. ही बाब खरी आहे. पण दरवाढीमुळे ग्राहक नक्कीच त्रस्त झाला आहे. सिलिंडरची सबसिडी बँक खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे ग्राहकाला महिन्याच्या प्रारंभी गॅस सिलिंडर खरेदीसाठी जास्त आर्थिक तरतूद करावी लागत आहे. वाढत्या महागाईत ही तरतूद गरीब आणि सामान्यांना अशक्य आहे. शिवाय वाढीव किमतीमुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा उद्देश धुळीस मिळाला आहे. पेट्रोल, डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश आणि घरगुती गॅसच्या किमती नियंत्रणात आणण्याच्या देशपातळीवरील ग्राहक पंचायतच्या मागणीकडे केंद्र सरकारने कानाडोळा केल्याचे दिसून येत असल्याचे मत अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.सात महिन्यात २३१ रुपयांनी महागलेयावर्षी एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत विना सबसिडी घरगुती गॅसच्या किमतीत तब्बल २३१ रुपयांची वाढ झाली आहे. सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा हवाला देत सिलिंडरची किंमत वाढविल्यास नोव्हेंबरमध्ये १००० रुपयांचा आकडा पार करण्याची दाट शक्यता आहे.

उज्ज्वला योजनेत दुसऱ्यांदा सिलिंडर खरेदीला नकारपंतप्रधान उज्ज्वला योजनेचे सत्य काही वेगळेच आहे. योजनेंतर्गत गॅस जोडणी घेणाऱ्या महिला दुसऱ्यांदा महागड्या किमतीमुळे सिलिंडर खरेदी करीत नाहीत. जवळपास ५० टक्के ग्राहक दर दोन महिनांनी गॅस सिलेंडर खरेदी करतात तर ३० टक्के महिला तीन-चार महिन्यानंतर गॅस सिलिंडर खरेदी करीत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. मोफत गॅस हा सरकारचा देखावा आहे. सरकारने किमती नियंत्रणात ठेवल्यास योजनेतील लाभार्थी आणि गरिबांना नक्कीच फायदा होईल, असे अनेक ग्राहक संघटनांचे मत आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर