शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

‘प्रधानमंत्री आवास’साठी दलालांची टोळी; पीडितांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:17 IST

नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर दलालांची टोळीच्या बिंग फुटले.

ठळक मुद्देअनेकांकडून उकळली हजारोंची रक्कम सोडतीनंतर फुटले दलालांचे बिंग

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या गृह प्रकल्पात घरकुल मिळवून देतो, अशी थाप मारून एका टोळीने घरकुल मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. नागपूर महानगर विकास प्राधिकरण व नासुप्र यांच्या संयुक्त विद्यमाने नैवेद्यम सभागृहात रविवारी आयोजित कार्यक्रमात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील घरकुलांची सोडत काढण्यात आली अन् कार्यक्रमानंतर या टोळीचे बिंग फुटले. त्यामुळे या टोळीने ज्यांच्याकडून रक्कम उकळली त्यांना आता उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.कुणीही झोपड्यात राहू नये, सर्वांना चांगली घरे मिळावी या हेतूने केंद्र सरकारने ठिकठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना राबविली. योजनेच्या प्रारंभी इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. घरकुलांच्या अर्जासाठी सुरुवातीला १०,५६० रुपये शुल्क आकारले गेले होते. गरीब लोक ांना ही रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले. १०,१५६ लोकांनी अर्ज नेले. यातील ८,४८१ लोकांनी अर्ज भरले. त्यापैकी ७,३५४ अर्जदार लाभार्थी (पात्र) ठरले. त्यांच्यासाठी वाठोडा, तरोडी, वांजरी यासारख्या पाच ठिकाणी सर्वसुविधांयुक्त घरे बांधण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४,३४५ घरकुलांचे वाटप करण्याचे निश्चित झाले. या घराची मालकी देण्यासाठी अत्यंत पारदर्शी पद्धतीचा वापर करण्यात आला. रविवारी, ११ आॅगस्टला आॅनलाईन लॉटरी (सोडत) काढण्यात आली. सरकार आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची नोडल एजंसी म्हणून काम करणारे एनआयटी प्रशासनातील उच्चपदस्थ पारदर्शीपणे काम करीत असताना काही भ्रष्ट प्रवृत्तीने या प्रकल्प प्रक्रियेत शिरकाव केला. त्यांनी अर्जदारांची कुठून आणि कशी यादी मिळवली कळायला मार्ग नाही. त्यांनी काही जणांना संपर्क करून तुम्हाला जेथे पाहिजे त्या ठिकाणी (तळमाळा, पहिला माळा, दुसरा माळा) घरकुल मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी ३० हजार रुपये भरावे लागतील, असे या भामटे सांगू लागले. आपण एनआयटीतून बोलतो, असेही हे भामटे सांगत होते.अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवरविशेष म्हणजे, हे भामटे ज्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता त्याला त्यांच्या अर्जाच्या फोटो कॉपी व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवू लागले. त्यामुळे अनेकांचा त्यावर विश्वास बसला. मे महिन्यांपासून सक्रिय झालेल्या या टोळीच्या थापेबाजीला अनेकजण बळी पडले. एनआयटीतूनच सर्व होणार असल्याची माहिती असल्याने आणि एनआयटीतून बोलतो, असे या टोळीतील भामटे सांगत असल्याने अनेकांनी मनासारखे घरकुल मिळावे म्हणून या टोळीतील भामट्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात रक्कम जमा केली. दरम्यान, आपल्याला आता जेव्हा केव्हा सोडत होईल तेव्हा मनासारखे घर मिळेल, असे मनोमन स्वप्न रंगविणाऱ्यांचा रविवारी झालेल्या सोडतीच्या कार्यक्रमानंतर स्वप्नभंग झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितांनी या टोळीतील भामट्यांना आपली रक्कम परत मागणे सुरू केले. काहींना अर्धवट रक्कम देऊन आरोपींनी आता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी