शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आझमगडच्या मातीतून साकारणार गणेशमूर्ती; नागपुरात पहिल्यांदा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 20:37 IST

Nagpur News नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे.

ठळक मुद्देसुंदर, रेखीव, टिकाऊ व ‘रेडी टू यूज’ मूर्ती

नागपूर : नागपुरातील काही मूर्तिकार यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्यांदाच उत्तर प्रदेशातील आझमगडच्या मातीपासून सुबक, सुंदर, टिकाऊ गणेशमूर्ती साकारत आहेत. हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. नागपूरच्या मातीप्रमाणे या मातीवर कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. माती ‘रेडी टू यूज’ आहे. या मातीपासून पहिल्यांदाच लहान आणि मोठी मूर्ती तयार होणार आहेत. माती महाग असली तरीही मूर्तीची किंमत वाढणार नाही.

स्थानिकच्या तुलनेत मातीची किंमत जास्त

आझमगडची माती टिकाऊ आहे. त्यामुळे अन्य मातीच्या तुलनेत या मातीपासून तयार होणारी मूर्ती सुबक, सुंदर, रेखीव बनते. पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाचे अध्यक्ष सुरेश पाठक म्हणाले, व्यावसायिक दृष्टिकोनातून शोध घेतला असता आझमगडच्या मातीचा पर्याय सापडला आणि खाणीतून काढलेली माती नागपुरात आणली. ३२ टन मातीची (एक ट्रक) किंमत ८५ हजार रुपये आहे. यात वाहतूक आणि अन्य खर्चाचा समावेश आहे. चार मूर्तिकार मिळून मातीचा ट्रक मागविला आहे. मातीत खडे, दगड नसल्यामुळे प्रक्रिया करण्याची गरज नाही. लवचीक असल्यामुळे थेट पाण्यात टाकून मूर्ती तयार करण्यासाठी वापरता येते. अन्य शाडूमातीचा विचार केल्यास ती गुजरातमधून येते. या मातीच्या तुलनेत आझमगडची माती ३० रुपयांनी स्वस्त आहे. अर्थात ३२० रुपयांत ५० किलो माती पडते. या मातीपासून तयार होणारी मूर्ती टणक असल्यामुळे रंग कमी प्रमाणात शोषून घेते. तसेच मूर्ती रेखीव बनते व उठून दिसते. मातीचा खर्च जास्त असला तरीही मूर्तीची किंमत वाढविण्यात येणार नाही.

नागपुरात सावरगाव व आंधळगावची माती

पाठक म्हणाले, नागपुरातील सर्वच मूर्तिकार नरखेड तालुक्यातील सावरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील माती मूर्ती तयार करण्यासाठी बोलवतात. सावरगावच्या चार टन मातीसाठी ७ हजार आणि             आंधळगावच्या सहा टन मातीसाठी ७ हजार रुपये खर्च येतो. चार दिवस प्रक्रिया केल्यानंतर माती मूर्ती बनविण्यासाठी तयार होते. पण या मातीपासून तयार केलेल्या मूर्तीला अनेकदा तडे जातात. शिवाय शाडूमातीच्या मूर्ती ठिसूळ बनतात. त्या जास्त अंतरावर पाठविता येत नाहीत.

आझमगड मातीचा प्रयोग पहिल्यांदा नागपुरात करण्यात येत आहे. याची माहिती सर्व मूर्तिकारांना झाल्यामुळे पुढे सर्वच मूर्तिकार या मातीचा उपयोग करतील. पुढे या मातीला आणि मातीपासून तयार केलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींना मागणी वाढणार असल्याचे सुरेश पाठक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव