शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सक्करदरा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन नाही

By admin | Updated: September 13, 2015 02:48 IST

या वर्षी गणेशोत्सवात सक्करदरा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण समितीने पर्यावरणप्रेमी संस्था,...

दोन मोठे कृत्रिम टँक राहणार : मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृतीनागपूर : या वर्षी गणेशोत्सवात सक्करदरा तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. सक्करदरा तलाव सौंदर्यीकरण समितीने पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना, शाळा व नागरिकांची मदत घेऊन यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. तलाव पसिरात दोन मोठे कृत्रिम टँक उभारले जातील. याशिवाय लहान कृत्रिम टँकही ठेवले जातील. यातच मूर्ती विसर्जित करावी लागेल.दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांनी या मोहिमेच्या जनजागृतीसाठी एक रथ तयार केला आहे. या रथाचे लोकार्पण शनिवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महाल येथे झाले. या वेळी कोहळे यांनी सांगितले की, सक्करदरा तलावातून गेल्या उन्हाळ्यात १८०० ट्रक माती काढून तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. त्यामुळे आता मूर्ती विसर्जनाने तलावात माती साचू नये, पाण्याचे प्रदूषण होऊ नये यासाठी तलावात मूर्ती विसर्जन करू दिले जाणार नाही. नागरिकांनीही त्यासाठी आग्रह धरू नये, असे आवाहन आ. कोहळे यांनी केले. नागरिकांमध्ये या विषयीची जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांची मदत घेतली जात आहे. समितीने जनजागृतीसाठी काढलेली पत्रके विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविली जात आहेत. याशिवाय जनजागृती करणारी एक व्हिडिओ क्लिप तयार करण्यात आली आहे. एक मोबाईल व्हॅन १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान सर्व गणेश मंडळांसमोर उभी राहील व पाच मिनिटांची चित्रफित दाखविली जाईल. भाजपचे कार्यकर्ते व सात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही या मोहिमेत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ईश्वर धिरडे, प्रा. विजय घुगे, नवीन खानोरकर, नगरसेविका दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, संजय ठाकरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)