शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

Ganesh Festival 2018; गणपती स्थापना: काय सांगते शास्त्र?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 13:35 IST

ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.

ठळक मुद्देप्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत करा स्थापना

 डॉ. अनिल वैद्य.लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्ञान व बुद्धीची देवता गणराय. सर्वांनाच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्यातच गौराई माहेरपणाला येणार आहेत. श्रीगणराया आणि महालक्ष्मी यांच्या स्थापनेसाठी आणि पूजनासाठी शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. त्याचा सारांश आपल्यासाठी देत आहोत.

प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत करा स्थापनागुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. या दिवशी सिद्धिविनायकाच्या मृण्मय मूर्तीची स्थापना करून पूजन केले जाते. या दिवशी दुपारी २.४९ पर्यंत भद्रा आहे. भाद्रपद महिन्यामधील पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट वेळ, मुहूर्त नसतो. त्यामुळे प्रात:कालापासून मध्यान्हपर्यंत (अंदाजे दुपारी १.३० वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते. तरीसुद्धा गुरुवारी ज्यावेळी नवग्रहांपैकी शुभ ग्रह गुरु, शुक्र, बुध व चंद्राचा जास्त शुभप्रभाव वातावरण असेल ती वेळ ज्योतिषांच्या मार्गदर्शनाखाली निवडल्यास फायदेशीर ठरेल. तरीसुद्धा सर्वोत्तम मुहूर्त सकाळी ९.३० ते दुपारी १.३० पर्यंत आहे. सार्वजनिक गणेशाची स्थापना वरील वेळेव्यतिरिक्त सायंकाळी ६.३० पर्यंत केली तरी चालेल. गुरुवारी राहू काल दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत आहे. श्री गणेश पूजन आणि स्थापनेसाठी याचा विचार करण्याची गरज नाही.

ईशान्य, पूर्व दिशा योग्यगणपतीची स्थापना ईशान्य, पूर्व दिशेला करून पूजन केल्यास उत्तम. देवकर्मासाठी ताजी फुले आणा. ती न सुकलेली आणि न किडलेली असावीत. तसेच देठासह वाहावीत. गणेशाला दुर्वा आणि लाल फुले अतिशय प्रिय आहेत. फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी गणेशाला तुळस वाहतात. दुर्वा आठ दिवसांनी शिळ्या होतात. शमी सहा दिवस शिळे होत नाही. ताजी फुले वाहिल्याने आपल्याला व देवाला आनंद होतो. आपल्याला प्रसन्न वाटते. शास्त्रात सांगितले आहे की तुळस ही कधीच शिळी होत नाही. सच्छिद्र झालेली फुले पर्युषित समजतात. देवाचे निर्माल्य काढताना तर्जनी व अंगठा या दोन बोटांचा उपयोग करावा. देवाला फुले वाहताना अंगठा, मध्यमा व अनामिका यांचा उपयोग करावा.

असे करा पूजनसकाळी स्थापना व पूजनाच्या वेळी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. रोज रात्री तेलाचा दिवा देवस्थळाच्या आग्नेय दिशेस लावावा. नैवेद्याचे ताट वाढल्यावर तूप वाढून तुळशीची पाने पदार्थांवर ठेवावीत. देवासमोर पाण्याने एक चौकोनी मंडळ काढावे, त्यावर पाट आणि पाटावर नैवेद्य ठेवावा. डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन ते प्रसादाभोवती प्रदशिक्षणाकार तीनदा फिरवावे. नंतर एक पळी पाणी ताह्मणात सोडावे. नंतर हा प्रसाद पाच वायूंना अर्पण करावा. यासाठी प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाथ स्वाहा आणि ब्रह्मणे स्वाहा म्हणावे. यामुळे शरीरातील पाच वायू ब्रह्मात विलीन होतात. नैवेद्य दाखवून मग त्याचे सेवन करावे.

‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’देवासमोर उभे राहून किंवा बसूनसुद्धा त्यालाच दाखवलेला प्रसाद खाऊ नये. देवाचा प्रसाद फारच अमूल्य आहे. तो पायदळी तुडवू नका. प्रसाद खाल्ल्यावर किमान घोटभर पाणी आवश्य प्यावे. डोळे मिटून कधीही देवाचे दर्शन घेऊ नका. दोन्ही हात जोडून देवाच्या चरणांकडे किंवा डोळ्याकडे पाहावे. देव तुमच्यासाठी २४ तास जागृत असतो. मग तुम्ही डोळे बंद का करता? आपल्या लायकीप्रमाणेच देवाकडे मागा- कारण ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८