शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Ganesh Chaturthi 2018; ‘गाणपत्य आचार्य परंपरा’ ; भगवान श्रीमुदगलाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 09:35 IST

केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य.

ठळक मुद्देमुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे

प्रा. स्वानंद गजानन पुंडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देवदूतांनो! जर स्वर्गात गेल्यावरही पुण्याच्या स्तरानुसार फळ मिळत असल्याने मत्सर शिल्लकच राहत असेल, जर पुण्य संपल्याक्षणी त्याला खाली ढकलून दिल्या जात असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तेथे केलेल्या कर्माचे फळ मिळणार नसेल तर अशा तुमच्या स्वर्गात राहण्यापेक्षा माझी ही भारतभूमी पवित्र आहे. मी येथेच राहील, असे थेट देवदूतांना सांगून स्वर्गाचे विमान परत करणारी भारतीय इतिहासातील अद्वितीय विभूती म्हणजे श्री मुद्गल आचार्य. भगवान श्री गणेशांच्या हातातील मुद्गल श्री सूर्य रूपात प्रगट होतो. सूर्याचे काम आहे अंधकार दूर करणे, तर मुद्गलाचे काम आहे प्रत्येक गोष्टीचे चूर्ण करणे. या दोन्ही गोष्टींना एकत्रित करून श्री गुरु मुद्गलाचार्यांचे कार्य चालते. श्री गुरु-शिष्यांच्या अज्ञानरूपी अंधकाराला दूर करतात आणि त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अहंकारादिक सगळ्या विकृतींचा चुराडा करतात. त्यामुळे भगवान मुद्गल हे मुदगरांश म्हणून शोभून दिसतात. मुद म्हणजे आनंद आणि गल म्हणजे ओसंडून वाहणे. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि विचारातून आनंद ओसंडून वाहतो त्यांना मुद्गल असे म्हणतात. दक्ष यज्ञ विनाशाच्या वेळी मस्तक कापलेल्या दक्षाला नंतर बोकडाचे डोके बसवण्यात आले त्यावेळी आत्मविस्मृत झालेल्या दक्षाला महर्षी मुद्गलांनी केलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. भगवान गणेशांना यथार्थरीतीने समजून घ्यायचे असेल तर श्रीमुद्गलपुराणाला पर्याय नाही. मानवाला आपल्या जीवनात परम आनंदी होण्याचा अंतिम मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण. या महर्षी मुद्गलांचा आश्रम नागपूरजवळील अदोष (अदासा) क्षेत्रावर होता. येथे श्री मुद्गलांनी पूजिलेले भगवान श्री शमीविघ्नेश आजही जगाला आनंद देण्यासाठी विराजमान आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८