शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

गांधीसागरही गटार झाले, कारणीभूत चार नाले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधीसागर तलावाचेही अस्तित्व संकटात येत आहे. तलावाचे पाणी प्रदूषणाचा धाेकादायक टप्पा ओलांडत असून येत्या ...

नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधीसागर तलावाचेही अस्तित्व संकटात येत आहे. तलावाचे पाणी प्रदूषणाचा धाेकादायक टप्पा ओलांडत असून येत्या काही वर्षात तेही गटार हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पर्यावरण संस्था नीरीच्या अहवालातूनही ही स्थिती स्पष्ट हाेत आहे. वस्त्यामधून तलावात दूषित पाणी घेऊन येणारे नाले या प्रदूषणास कारणीभूत ठरले असून त्यावर नियंत्रण मिळविल्याशिवाय गांधीसागत तलाव आपले पूर्ववैभव प्राप्त करू शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी तलावाच्या सर्वेक्षणातून काही महत्त्वाच्या बाबी अधाेरेखित केल्या. आसपासच्या वस्त्यामधून येणारे नाले गांधीसागर तलावात येऊन मिळतात. भालदारपुरा, बजेरिया व जवळच्या वस्त्यामधून नाल्याद्वारे येणारे दूषित पाणी थेट तलावातच साेडले जाते. नाल्याच्या पाण्यामुळे स्वच्छ पाण्याचे स्रोतच उरले नाही. भाेसले काळात हा तलाव बांधला गेला तेव्हा सीताबर्डी टेकडीवरील पाणी वाहत तलावात येत हाेते. कधीकाळी तेलंगखेडी तलावाचे पाणी गांधीसागत हाेत महालमध्ये पाेहचत हाेते. मात्र आता ही गाेष्ट इतिहासजमा झाली आहे. सर्वत्र सिमेंटच्या इमारती उभ्या झाल्या असून शुद्ध पाणी येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. आता तलावात दिसणारे पाणी हे नाल्याद्वारे आलेलेच पाणी हाेय, असा दावा त्यांनी केला. जवळच्या वस्तीमधील जनावर धुतल्यानंतर पाणी तलावातच जाते. इतक्या वर्षापासून मूर्त्यांचे विसर्जन तलावात हाेत असल्याने गाळही वाढला आहे. त्यामुळे तलावातील जैवविविधता नष्ट हाेत आहे.

नीरीच्या अहवालाने चिंता

- सीओडीचे प्रमाण १४ ते १०९ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत वाढलेले आहे. यावरून प्रदूषण धाेकादायक स्थितीत पाेहचले आहे.

- फाॅस्फरससारख्या घटकाचे प्रमाण वाढले असल्याने शेवाळसारख्या जलवनस्पतींची वाढ हाेत आहे. युट्राेफिकेशन एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे.

- त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असून मासे व इतर सजीवांना नुकसान हाेत आहे.

- उच्च प्रमाणात फायटाेप्लॅन्कटन्स वाढीला कारणीभूत घटकांची वाढ.

- राॅटीफर्सच्या अस्तित्वामुळे पाणी अती प्रदूषित असल्याचे संकेत मिळतात. पाणी पिण्यायाेग्य नाहीच पण वापरण्यासह हानीकारक हाेत आहे.

उपाय

- नाल्याचे पाणी तलावात जाऊ न देणे किंवा नियंत्रित करणे.

- एसटीपीसारखी व्यवस्थेद्वारे नाल्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतरच तलावात साेडावे.

- पावसाचे पाणी वाहत जाईल, अशा पद्धतीने कॅचमेंट तयार करणे आवश्यक आहे.

- गाळाचा संपूर्ण उपसा करून पाणी शुद्ध हाेण्यास चालना मिळेल.

- तलावात कचरा फेकला जाणार नाही याची काटेकाेर काळजी घेणे, दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.

- आसपास हाेणाऱ्या अतिक्रमणावर पूर्णपणे प्रतिबंध घालणे.