शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

गांधीसागरही गटार झाले, कारणीभूत चार नाले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधीसागर तलावाचेही अस्तित्व संकटात येत आहे. तलावाचे पाणी प्रदूषणाचा धाेकादायक टप्पा ओलांडत असून येत्या ...

नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधीसागर तलावाचेही अस्तित्व संकटात येत आहे. तलावाचे पाणी प्रदूषणाचा धाेकादायक टप्पा ओलांडत असून येत्या काही वर्षात तेही गटार हाेण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पर्यावरण संस्था नीरीच्या अहवालातूनही ही स्थिती स्पष्ट हाेत आहे. वस्त्यामधून तलावात दूषित पाणी घेऊन येणारे नाले या प्रदूषणास कारणीभूत ठरले असून त्यावर नियंत्रण मिळविल्याशिवाय गांधीसागत तलाव आपले पूर्ववैभव प्राप्त करू शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पर्यावरण कार्यकर्ते शरद पालिवाल यांनी तलावाच्या सर्वेक्षणातून काही महत्त्वाच्या बाबी अधाेरेखित केल्या. आसपासच्या वस्त्यामधून येणारे नाले गांधीसागर तलावात येऊन मिळतात. भालदारपुरा, बजेरिया व जवळच्या वस्त्यामधून नाल्याद्वारे येणारे दूषित पाणी थेट तलावातच साेडले जाते. नाल्याच्या पाण्यामुळे स्वच्छ पाण्याचे स्रोतच उरले नाही. भाेसले काळात हा तलाव बांधला गेला तेव्हा सीताबर्डी टेकडीवरील पाणी वाहत तलावात येत हाेते. कधीकाळी तेलंगखेडी तलावाचे पाणी गांधीसागत हाेत महालमध्ये पाेहचत हाेते. मात्र आता ही गाेष्ट इतिहासजमा झाली आहे. सर्वत्र सिमेंटच्या इमारती उभ्या झाल्या असून शुद्ध पाणी येण्याचे मार्ग बंद झाले आहेत. आता तलावात दिसणारे पाणी हे नाल्याद्वारे आलेलेच पाणी हाेय, असा दावा त्यांनी केला. जवळच्या वस्तीमधील जनावर धुतल्यानंतर पाणी तलावातच जाते. इतक्या वर्षापासून मूर्त्यांचे विसर्जन तलावात हाेत असल्याने गाळही वाढला आहे. त्यामुळे तलावातील जैवविविधता नष्ट हाेत आहे.

नीरीच्या अहवालाने चिंता

- सीओडीचे प्रमाण १४ ते १०९ मिलिग्रॅम/लिटर पर्यंत वाढलेले आहे. यावरून प्रदूषण धाेकादायक स्थितीत पाेहचले आहे.

- फाॅस्फरससारख्या घटकाचे प्रमाण वाढले असल्याने शेवाळसारख्या जलवनस्पतींची वाढ हाेत आहे. युट्राेफिकेशन एक गंभीर पर्यावरणीय समस्या आहे.

- त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी हाेत असून मासे व इतर सजीवांना नुकसान हाेत आहे.

- उच्च प्रमाणात फायटाेप्लॅन्कटन्स वाढीला कारणीभूत घटकांची वाढ.

- राॅटीफर्सच्या अस्तित्वामुळे पाणी अती प्रदूषित असल्याचे संकेत मिळतात. पाणी पिण्यायाेग्य नाहीच पण वापरण्यासह हानीकारक हाेत आहे.

उपाय

- नाल्याचे पाणी तलावात जाऊ न देणे किंवा नियंत्रित करणे.

- एसटीपीसारखी व्यवस्थेद्वारे नाल्याच्या पाण्याचे शुद्धीकरण केल्यानंतरच तलावात साेडावे.

- पावसाचे पाणी वाहत जाईल, अशा पद्धतीने कॅचमेंट तयार करणे आवश्यक आहे.

- गाळाचा संपूर्ण उपसा करून पाणी शुद्ध हाेण्यास चालना मिळेल.

- तलावात कचरा फेकला जाणार नाही याची काटेकाेर काळजी घेणे, दंडात्मक कारवाईची तरतूद करणे.

- आसपास हाेणाऱ्या अतिक्रमणावर पूर्णपणे प्रतिबंध घालणे.