शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गांधींचा धर्म पूजाघरात नव्हे, तर जनतेत होता : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 23:35 IST

जगाच्या इतिहासात महात्मा गांधींनी असाध्य ते साध्य केले. म्हणूनच हिंदू-मुस्लिमांनी त्यांना साथ दिली. त्यांचा धर्म पूजाघरात कधीच नव्हता. मंदिर वा मशिदितही नव्हता; तर जनतेत होता, असे प्रतिपादन नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांंनी केले.

ठळक मुद्देयुगांतर व्याख्यानमालेतील अंतीम विचारपुष्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगाच्या इतिहासात महात्मा गांधींनी असाध्य ते साध्य केले. म्हणूनच हिंदू-मुस्लिमांनी त्यांना साथ दिली. त्यांचा धर्म पूजाघरात कधीच नव्हता. मंदिर वा मशिदितही नव्हता; तर जनतेत होता, असे प्रतिपादन नागपूर लोकमत आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांंनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित युगांतर व्याख्यानमालेचे ‘धर्म आणि महात्मा गांधी’ या विषयावरील अंतीम दहावे पुष्प त्यांनी सोमवारी गुंफले. याप्रसंगी ते बोलत होते. व्याख्यानात ते म्हणाले, गांधी स्वत:ला सनातन हिंदू समजत. गिता हा आपला प्राणग्रंथ आहे असे सांगत; एवढेच नाही तर ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ असेही म्हणत असत. खरे तर, एक धर्म कधीच दुसऱ्या धर्माला कधीच बरोबरीचा मानत नाही. पण गांधी ईश्वर आणि अल्ला एकाच वेळी सांगायचे आणि जगही ते मानायचे. सनातनी धर्माला अर्थात मानवतेला अनादी काळ असतो. गांधींच्या सायंप्रार्थनेत सर्वधर्मीयांच्या प्रार्थना होत असत. ते माणूसधर्म सांगायचे. माणसामाणसात फरक करणाऱ्या गोष्टी मान्य नाही, धर्माच्या सीमारेषा पुसट व्हाव्या, असे ते नेहमी म्हणायचे.रसेल म्हणायचे, जगातील सर्व देशांनी एक यावे. पण गांधी म्हणायचे, देशांनी नव्हे तर सर्व माणसांनी एक यावे. तसे झाले तर जगात कोणताच प्रश्न उरणार नाही. कोणत्याही पदावर नसणाऱ्या या माणसामागे संपूर्ण देश चालत गेला. हाती शस्त्र न घेता लढलेल्या या माणसाची समाज हीच शक्ती होती. गांधी हे धर्म आणि माणसांच्या पलिकडचे होते. माणुसकीच्या धर्माची उपासना त्यांनी केली. त्यांची धर्मकल्पना धर्माच्या मर्यादा नाकारून माणसांपर्यंत पोहचणारी होती.प्रतिष्ठानच्या वतीने द्वादशीवार यांचा सत्कारया अंतीम व्याख्यानाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राच्या वतीने सुरेश द्वादशीवार यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, कवि यशवंत मनोहर, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. सलग दहा दिवसांच्या व्याख्यानमालेचा पायंडा पाडल्याबद्दल पाहुण्यांनी आयोजकांचे कौतूक केले. द्वादशीवार यांची सध्यास्थितीवरील ही व्याख्याने म्हणजे वैचारिक बिजारोपण असून येणाºया काळासाठी दिशादर्शन असल्याची भावना पाहुण्यांनी व्यक्त केली. संचालन प्रमोद मुनघाटे यानी तर आभार अरूणा सबाने यांनी मानले.

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी