शहरं
Join us  
Trending Stories
1
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
4
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
5
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
6
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
7
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
8
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
9
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
10
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
11
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
12
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
13
काय सांगता ! पुणे शहरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध, चालक गाडी चालवतात शांतपणे
14
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
15
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
16
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
17
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
18
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
19
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
20
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
Daily Top 2Weekly Top 5

गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:51 IST

महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.

ठळक मुद्देजागतिक अहिंसा दिन आयोजन समितीची व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती आणि स्वयंम् सामाजिक संस्थेच्या वतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सुरेश द्वादशीवार यांचे ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. व्याख्यानात द्वादशीवार म्हणाले, धर्म ही केवळ माणसांना संघटित करणारीच नव्हे तर दूर करणारीही व्यवस्था आहे. भारतासह जगाच्या पाठीवर धर्माच्या नावाखाली अनेक लढाया झाला. धर्मातच नव्हे तर धर्माच्या पंथातही लढाया झाल्या. १४ व्या शतकात १२ कोटींपैकी ४० लाख माणसे या लढाईत मारली गेली. म्हणूनच वैर विसरा आणि एकत्र या, असे आवाहन गांधी करायचे.धर्म हा मानवनिर्मित आहे. मात्र यापुढेही माणुसकीचा धर्म व्यापून उरतो. देशाच्या फाळणीनंतर दंगली उसळल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी त्या शमविण्यासाठी फिरत राहिले. कोलकात्यामध्ये दंगली पेटल्यावर ते पाकिस्तानचे नेते शहीद सुरावर्दी यांना सोबत घेऊन गल्लीबोळातून शांततेचे आवाहन करत फिरत होते. ३० ऑगस्टला एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी मुक्कामाला असताना त्यांच्यावर बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला. डोक्यावर सुरा मारला. देश स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना गांधी मात्र शांतीचे आवाहन करीत मार खात फिरत होते. ३० जानेवारी या गांधी हत्येचा प्रसंगही त्यांनी व्याख्यानातून उभा केला. ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिंसा सांगितली, त्यांचाच शेवट हिंसेतून झाला. त्यातूनही जगात अहिंसेचाच संदेश गेला, हीच त्यांच्या आयुष्याची खरी ताकद आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी प्रास्ताविक विलास मुत्तेमवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले.‘ही’ तर गांधींची दुसरी हत्याचइंग्रज सरकारने आणलेला रौलट अ‍ॅक्ट हा भारतीयांना गुलाम करणारा आणि भारतीयांचे हक्क हिसकावणारा कायदा होता. २०२० च्या प्र्रारंभी देशात येऊ घातलेले कायदे देशातील अल्पसंख्यकांवर असेच अन्याय करणारे आहेत. वर्षानुवर्षे हयात घालविणाऱ्यांना प्रमाणपत्र मागणे ही गांधींची दुसरी हत्याच आहे, अशी टीका द्वादशीवार यांनी केली.