शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार  : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 23:51 IST

महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.

ठळक मुद्देजागतिक अहिंसा दिन आयोजन समितीची व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधींनी आपले विचार कुठेही ग्रंथरूपाने लिहिलेले नाहीत. कृतार्थ जीवन जगलेल्या गांधींचे जीवन हाच त्यांचा विचार आहे, ते समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत सुरेश द्वादशीवार यांनी केले.जागतिक अहिंसा दिन आयोजन समिती आणि स्वयंम् सामाजिक संस्थेच्या वतीने विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात सुरेश द्वादशीवार यांचे ‘सामाजिक एकतेसाठी गांधी विचारांची गरज’ या विषयावर व्याख्यान झाले. व्यासपीठावर आमदार विकास ठाकरे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. व्याख्यानात द्वादशीवार म्हणाले, धर्म ही केवळ माणसांना संघटित करणारीच नव्हे तर दूर करणारीही व्यवस्था आहे. भारतासह जगाच्या पाठीवर धर्माच्या नावाखाली अनेक लढाया झाला. धर्मातच नव्हे तर धर्माच्या पंथातही लढाया झाल्या. १४ व्या शतकात १२ कोटींपैकी ४० लाख माणसे या लढाईत मारली गेली. म्हणूनच वैर विसरा आणि एकत्र या, असे आवाहन गांधी करायचे.धर्म हा मानवनिर्मित आहे. मात्र यापुढेही माणुसकीचा धर्म व्यापून उरतो. देशाच्या फाळणीनंतर दंगली उसळल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी त्या शमविण्यासाठी फिरत राहिले. कोलकात्यामध्ये दंगली पेटल्यावर ते पाकिस्तानचे नेते शहीद सुरावर्दी यांना सोबत घेऊन गल्लीबोळातून शांततेचे आवाहन करत फिरत होते. ३० ऑगस्टला एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी मुक्कामाला असताना त्यांच्यावर बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला. डोक्यावर सुरा मारला. देश स्वातंत्र्याचा आनंद लुटत असताना गांधी मात्र शांतीचे आवाहन करीत मार खात फिरत होते. ३० जानेवारी या गांधी हत्येचा प्रसंगही त्यांनी व्याख्यानातून उभा केला. ज्या महात्म्याने आयुष्यभर अहिंसा सांगितली, त्यांचाच शेवट हिंसेतून झाला. त्यातूनही जगात अहिंसेचाच संदेश गेला, हीच त्यांच्या आयुष्याची खरी ताकद आहे. व्याख्यानाच्या प्रारंभी प्रास्ताविक विलास मुत्तेमवार यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार विशाल मुत्तेमवार यांनी मानले.‘ही’ तर गांधींची दुसरी हत्याचइंग्रज सरकारने आणलेला रौलट अ‍ॅक्ट हा भारतीयांना गुलाम करणारा आणि भारतीयांचे हक्क हिसकावणारा कायदा होता. २०२० च्या प्र्रारंभी देशात येऊ घातलेले कायदे देशातील अल्पसंख्यकांवर असेच अन्याय करणारे आहेत. वर्षानुवर्षे हयात घालविणाऱ्यांना प्रमाणपत्र मागणे ही गांधींची दुसरी हत्याच आहे, अशी टीका द्वादशीवार यांनी केली.