शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

नागपुरातील गांधीसागर मर्डर मिस्ट्री : राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:38 IST

गांधीसागर तलावातील हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देठाणेदार हिवरे आणि चमूला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावातील हत्याकांडाच्या तपासाला पोलीस महासंचालनालयातून राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आले आहे. कोणताही पुरावा नसताना अन् मृताची ओळख पटण्यासारखे कोणतेही चिन्ह नसताना मारेकऱ्यांचा छडा लावून एका गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा उलगडा केल्याबद्दल लकडगंजचे ठाणेदार नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या पथकातील सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले आहे.जुलै २०१९ मध्ये गांधीसागर तलावात दोन पोते आढळली होती. या दोन्ही पोत्यात एका व्यक्तीच्या शरीराचे सात तुकडे आढळले होते. मृतदेह ओळखू येत नसल्याने मारेकऱ्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकरीचे काम ठरले होते. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी गुन्हे शाखेत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी आपल्या पथकातील सहकाऱ्यांसह तब्बल २८ दिवस तपास केला. या दरम्यान मृताची ओळख पटविण्यासाठी बेपत्ता नोंद असलेल्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी करून घेतली. सुमारे ५०० सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले अन् अखेर मृत व्यक्ती सुधाकर रंगारी (वय २८, रा. जरीपटका) असल्याचे शोधून काढले. त्याची हत्या करणारे आरोपी राहुल पद्माकर भोतमांगे आणि राहुल ज्ञानेश्वर धापोडकर (रा. तांडापेठ) या दोघांना अटक केली. आरोपींनी हत्या केल्यानंतर तुकडे करण्यासाठी वापरलेले कटर तसेच मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरून तलावात टाकण्यासाठी वापरण्यात आलेला ई-रिक्षाही जप्त केला.पोलीस महासंचालनालयातून या तपासाला सप्टेंबर २०१९ चा राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास घोषित करण्यात आला. त्यानुसार सध्या लकडगंजचे ठाणेदार असलेले नरेंद्र हिवरे आणि एपीआय पंकज धाडगे, नीतेश डोर्लीकर, एएसआय राजेंद्र बघेल आणि संदीप मावलकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस महासंचालकांनी १० हजारांचा रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रही जाहीर केले.मुंबईत होणार गौरवया सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हिवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुंबईत पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव होणार आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत यापूर्वीच ७५ हजारांचा रोख पुरस्कार देऊन हिवरे आणि चमूला गौरविले होते. २००३ मध्ये हिवरे खापा ठाण्यात ठाणेदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी त्यावेळी तिहेरी हत्याकांडाचा उलगडा केला होता. त्याहीवेळी त्यांच्या तपासाला राज्यातील सर्वोत्कृष्ट तपास म्हणून गौरविण्यात आले होते. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या तपासाबाबत हिवरे आणि त्यांच्या चमूला हा पुरस्कार देऊन त्यांचे अभिनंदन केले.

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस