शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाही; जब्बार पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 13:30 IST

गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे चर्चेतून उलगडले पैलू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपट महोत्सवात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ. आंबेडकर या चित्रपटावर चर्चा करताना ते बोलत होते. या चित्रपटाच्या संदर्भात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जब्बार पटेल यांची मुलाखत घेतली. या चित्रपटाबद्दल बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, या सिनेमामुळे मला लोकांनी उचलून धरले. गावपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविले. त्यांनी चित्रपटासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. अभिनेते ममुट्टी यांनी बाबासाहेब कसे साकारले याबद्दल त्यांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी या चित्रपटाला महाकाव्य म्हणून संबोधले असल्याचे पटेल म्हणाले. या सिनेमासाठी हजारो लोकांनी एक कप चहा व वडा पाव खाऊन अभिनय केल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या नावावर कोलंबिया विद्यापीठाचा परिसर नि:शुल्क शुटींगसाठी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी चित्रपटाच्या अनेक बारकाव्यासंदर्भात जब्बार पटेल यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Jabbar Patelजब्बार पटेल