शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाही; जब्बार पटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 13:30 IST

गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटाचे चर्चेतून उलगडले पैलू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी विरुद्ध आंबेडकर असा विचारप्रवाह समाजात आहे. पण खऱ्या अर्थाने आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होऊच शकत नाही. कारण त्यांच्या विचारांचे प्रवाह वेगळे असले तरी, त्यांचा उद्देश मात्र देशहिताचा आहे. असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपट महोत्सवात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या डॉ. आंबेडकर या चित्रपटावर चर्चा करताना ते बोलत होते. या चित्रपटाच्या संदर्भात डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जब्बार पटेल यांची मुलाखत घेतली. या चित्रपटाबद्दल बोलताना जब्बार पटेल म्हणाले की, या सिनेमामुळे मला लोकांनी उचलून धरले. गावपातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविले. त्यांनी चित्रपटासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली. अभिनेते ममुट्टी यांनी बाबासाहेब कसे साकारले याबद्दल त्यांनी सांगितले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी या चित्रपटाला महाकाव्य म्हणून संबोधले असल्याचे पटेल म्हणाले. या सिनेमासाठी हजारो लोकांनी एक कप चहा व वडा पाव खाऊन अभिनय केल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या नावावर कोलंबिया विद्यापीठाचा परिसर नि:शुल्क शुटींगसाठी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सभागृहात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांनी चित्रपटाच्या अनेक बारकाव्यासंदर्भात जब्बार पटेल यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :Jabbar Patelजब्बार पटेल