शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

लाखाेंच्या संख्येने माेरपंख येतात कुठून; पंख गळलेले की माेरांची कत्तल करून आणलेले

By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 19:09 IST

सजावटीत माेरपंख लावले नाही तरी गणपती बाप्पा खुश हाेतील

नागपूर : लवकरच लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन घराेघरी हाेणार आहे. तयारीलाही वेग आला आहे. यात सजावट महत्त्वाची असते. या सजावटीला अधिक आकर्षित करण्यासाठी माेरपीसांचा वापर केला जाताे. मात्र हे माेरपंख माेरांची कत्तल करून तर आणले नाहीत, याचाही विचार करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे. सजावटीत माेरपंख वापरले नाही तरी गणपत्ती बाप्पा खुश हाेतीलच, अशी भावना व्यक्त हाेत आहे.

दरवर्षी उत्सवाच्या काळात लाखाेंच्या संख्येने माेरपंख बाजारात विक्रीला येतात. गल्लाेगल्लीत माेरपीस विकणारे फिरताना दिसतात. शिवाय सजावटीचे साहित्य विक्रेते व फूटपाथ विक्रेत्यांकडेही सर्रास माेरपंखांची विक्री हाेते. विशेष म्हणजे माेर हा राष्ट्रीय प्राणी असून त्याची शिकार किंवा अवयवांची विक्री करणे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. मात्र बाजारात राजराेसपणे माेरपंखांची विक्री केली जाते. माेरांचे गळलेले पंख विक्रीस आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र एकाचवेळी लाखाेंच्या संख्येने पंख गळत असतील का, हा माेठा प्रश्न आहे. त्यामुळे उत्सवासाठी माेरांची कत्तल करून किंवा ओरबडून पंख काढले जात असण्याची शक्यता निसर्गसाथी फाउंडेशनचे प्रवीण कडू यांनी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाे पंख

गेल्या वर्षी एका उत्तरप्रदेशच्या तरुणाला माेरपंख विक्री करताना हिंगणघाटमध्ये पकडण्यात आले हाेते. त्याने दिलेली माहिती धक्कादायक हाेती. हे पंख माेठ्या व्यापाऱ्याद्वारे किलाेने विकले जातात. नागपूर शहरातील अशा व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाेंच्या संख्येने पंख राहत असल्याचे त्याने वनविभागाला सांगितले हाेते. यावरून हा व्यापार किती माेठा आहे, याचा अंदाज येताे. इतर शहरातही असा प्रकार हाेत असल्याचे नाकारता येत नाही.

उत्तरप्रदेश, राजस्थानाहून आणले जातात

मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यात माेठ्या प्रमाणात माेरपंखांची विक्री केली जाते. या राज्यामधूनच सर्वत्र माेरपंखांचा पुरवठा हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरचे माेर घटले

नागपूर जिल्ह्यात १० वर्षापूर्वी ३० हजाराच्यावर माेरांची संख्या हाेती. आता ती ९ हजाराच्या खाली आली आहे. माेरपंखासाठीही माेरांची कत्तल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे माेरांच्या संख्येबाबत व संरक्षणाबाबत वनविभागाची यंत्रणा फारसी गंभीर नाही. शिकारीचे एखाद्याच प्रकरणात कारवाई हाेते.

विणीच्या हंगामानंतर गळतात पंख

पावसाळा हा इतर पक्ष्यांप्रमाणे माेरांचाही प्रजननाचा काळ असताे. केवळ नर माेराला असे आकर्षक पंख असतात. विणीच्या हंगामानंतर त्यांचे पिसारे गळतात. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात गळती हाेत नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले.

वनविभागाने माेरपंखांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवावे. माेर हा गणपतीचे बंधू कार्तिकदेवाचे वाहन आहे. नागरिकांनी सजावटीत माेरपंखांचा वापर टाळून या राष्ट्रीय पक्ष्याचे रक्षण करावे.- प्रवीण कडू, निसर्गसाथी फाउंडेशन