शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

लाखाेंच्या संख्येने माेरपंख येतात कुठून; पंख गळलेले की माेरांची कत्तल करून आणलेले

By निशांत वानखेडे | Updated: August 28, 2023 19:09 IST

सजावटीत माेरपंख लावले नाही तरी गणपती बाप्पा खुश हाेतील

नागपूर : लवकरच लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन घराेघरी हाेणार आहे. तयारीलाही वेग आला आहे. यात सजावट महत्त्वाची असते. या सजावटीला अधिक आकर्षित करण्यासाठी माेरपीसांचा वापर केला जाताे. मात्र हे माेरपंख माेरांची कत्तल करून तर आणले नाहीत, याचाही विचार करण्याचे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे. सजावटीत माेरपंख वापरले नाही तरी गणपत्ती बाप्पा खुश हाेतीलच, अशी भावना व्यक्त हाेत आहे.

दरवर्षी उत्सवाच्या काळात लाखाेंच्या संख्येने माेरपंख बाजारात विक्रीला येतात. गल्लाेगल्लीत माेरपीस विकणारे फिरताना दिसतात. शिवाय सजावटीचे साहित्य विक्रेते व फूटपाथ विक्रेत्यांकडेही सर्रास माेरपंखांची विक्री हाेते. विशेष म्हणजे माेर हा राष्ट्रीय प्राणी असून त्याची शिकार किंवा अवयवांची विक्री करणे वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. मात्र बाजारात राजराेसपणे माेरपंखांची विक्री केली जाते. माेरांचे गळलेले पंख विक्रीस आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र एकाचवेळी लाखाेंच्या संख्येने पंख गळत असतील का, हा माेठा प्रश्न आहे. त्यामुळे उत्सवासाठी माेरांची कत्तल करून किंवा ओरबडून पंख काढले जात असण्याची शक्यता निसर्गसाथी फाउंडेशनचे प्रवीण कडू यांनी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाे पंख

गेल्या वर्षी एका उत्तरप्रदेशच्या तरुणाला माेरपंख विक्री करताना हिंगणघाटमध्ये पकडण्यात आले हाेते. त्याने दिलेली माहिती धक्कादायक हाेती. हे पंख माेठ्या व्यापाऱ्याद्वारे किलाेने विकले जातात. नागपूर शहरातील अशा व्यापाऱ्यांच्या गाेदामात लाखाेंच्या संख्येने पंख राहत असल्याचे त्याने वनविभागाला सांगितले हाेते. यावरून हा व्यापार किती माेठा आहे, याचा अंदाज येताे. इतर शहरातही असा प्रकार हाेत असल्याचे नाकारता येत नाही.

उत्तरप्रदेश, राजस्थानाहून आणले जातात

मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यात माेठ्या प्रमाणात माेरपंखांची विक्री केली जाते. या राज्यामधूनच सर्वत्र माेरपंखांचा पुरवठा हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरचे माेर घटले

नागपूर जिल्ह्यात १० वर्षापूर्वी ३० हजाराच्यावर माेरांची संख्या हाेती. आता ती ९ हजाराच्या खाली आली आहे. माेरपंखासाठीही माेरांची कत्तल हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे माेरांच्या संख्येबाबत व संरक्षणाबाबत वनविभागाची यंत्रणा फारसी गंभीर नाही. शिकारीचे एखाद्याच प्रकरणात कारवाई हाेते.

विणीच्या हंगामानंतर गळतात पंख

पावसाळा हा इतर पक्ष्यांप्रमाणे माेरांचाही प्रजननाचा काळ असताे. केवळ नर माेराला असे आकर्षक पंख असतात. विणीच्या हंगामानंतर त्यांचे पिसारे गळतात. मात्र एवढ्या माेठ्या प्रमाणात गळती हाेत नाही, असे कडू यांनी स्पष्ट केले.

वनविभागाने माेरपंखांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवावे. माेर हा गणपतीचे बंधू कार्तिकदेवाचे वाहन आहे. नागरिकांनी सजावटीत माेरपंखांचा वापर टाळून या राष्ट्रीय पक्ष्याचे रक्षण करावे.- प्रवीण कडू, निसर्गसाथी फाउंडेशन