शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

गजभियेंनी अखेरपर्यंत दिली झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:17 IST

कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रियेदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.

ठळक मुद्देमतदानापासून मतमोजणीपर्यंत : आक्षेपांमुळे प्रशासन हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोई हार गया, कोई जीत गया, आखिर ये इलेक्शन भी बित गया..., पण काही उमेदवार पराभव सहज मान्य करीत नाहीत. रामटेक लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेत काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी पराभव समोर दिसत असतानाही एकाकी लढा देत अखेरपर्यंत खिंड लढविली आणि प्रक्रियेदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर घेतलेल्या आक्षेपामुळे प्रशासनाला चांगलेच जेरीस आणले.रामटेक लोकसभेची निवडणूक सुरुवातीपासूनच चांगलीच चर्चेत राहिली. पक्षाने ऐनवेळी किशोर गजभिये यांची उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रामटेकमधूनच नितीन राऊत यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला. पण एबी फॉर्म नसल्याने ते अर्ज दाखल करू शकले नाहीत. पुढे प्रचारादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत किशोर गजभियेंना साथ दिल्याचे म्हणतात. पण मतमोजणीदरम्यान असे काही चित्र दिसून आले नाही. जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार सुनील के दार, नाना गावंडे, मुजीब पठाण या काँग्रेसच्या नेत्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही मतमोजणीला फारसे गांभीर्याने घेतले नाही.मतमोजणी सुरू झाल्यापासून गजभिये यांनी स्वत: संपूर्ण मतदार संघाची धुरा सांभाळली. काही बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते पोलिंग एजंट म्हणून दिसले. पण गजभियेंच्या पराभवाच्या छटा उमटायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आणि एक एक करता कार्यकर्त्यांनी आपल्या घरचा रस्ता पकडला. मात्र गजभियेंनी संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत मतमोजणी स्थळावर ठिय्या कायम ठेवला. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान त्यांना आढळलेल्या त्रुटींवर ते सातत्याने आक्षेप घेत होते. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या आक्षेपांची संख्या ५० वर पोहचली होती.त्यांच्या आक्षेपाचे समाधान करता करता प्रशासनही चांगलेच जेरीस आले होते. तरीही प्रशासनाने त्यांच्या आक्षेपांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तुमानेंची लीड एक लाखावर पोहचल्यानंतरही गजभिये आपल्या आक्षेपांवर ठाम होते. जोपर्यंत समाधान होणार नाही, तोपर्यंत मी हरलो नाही, असे ते म्हणत होते. सुरुवातीपासूनच एकाकी झुंज दिलेल्या गजभियेंना रामटेकच्या मतदारांनी चांगले सहकार्य केले. गेल्या निवडणुकीत मुकुल वासनिक यांना मिळालेल्या मतांपेक्षा गजभिये यांनी सव्वा लाख मते अधिक घेतले. या निवडणुकीत गजभिये यांचा पराभव झाला असला तरी, त्यांनी दिलेली वैयक्तिक झुंज वाखाणण्याजोगी होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालramtek-pcरामटेक