शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

गाेसेखुर्दच्या ‘बॅक वाॅटर’चा वापर सिंचनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील आमनदीत साचून राहत असल्याने अलीकडच्या काळात या नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा तसेच त्यासाठी तालुक्यात किमान दाेन उपसा सिंचन याेजना मंजूर करून त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील ५४ गावे विस्थापित झाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या जलाशयाच्या ‘बॅक वाॅटर’मुळे वैनगंगा नदीत विलीन हाेणाऱ्या तालुक्यातील सर्व नद्या तुंबतात आणि त्या नद्यांमधील पाणी परिसरात पसरत असल्याने पिकांचे माेठे नुकसान हाेते. यातील आमनदी ही कुही तालुक्यातील प्रमुख नदी असून, या नदीत गाेसेखुर्दचे ‘बॅक वाॅटर’ आणि मकरधाेकडा शिवारातील जलाशयाचे ‘लिकेज वाॅटर’ गाेळा हाेत असल्याने ही नदी वर्षभर तुडूुब भरून असते. मात्र, त्या पाण्याचा सिंचनासाठी काडीचाही उपयाेग हाेत नाही.

आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजनेचे पाणी तालुक्यातील पचखेडीपर्यंत आले आहे. आमनदीवर मांढळ व तारणा येथे उपसा सिंचन याेजना तयार केल्यास मांढळ व तितूर सर्कलमधील शेतीला सिंचनासाठी सहज पाणी उपलब्ध हाेऊ शकते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह ओलिताची रबी पिके घेणे सहज शक्य हाेणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात तसेच शेतमालाच्या उत्पादनात वाढ हाेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही उपसा सिंचन याेजनांना राज्य शासनाने मंजुरी देऊन त्या कार्यान्वित कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे, लीलाधर धनविजय, अर्चना हरडे, विनोद हरडे, संजय निरगुळकर, संगीता निरगुळकर, तुळसीदास कळंबे, मनोज कावळे, बंडू वैद्य, पांडुरंग मेश्राम, निरंजन नागदेवे, मुरलीधर झोडापे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

एकमेव उपसा सिंचन याेजना

कुही तालुक्यातील आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजना ही एकमेव असून, ही याेजना आमनदीवर आहे. या याेजनेमुळे या भागातील २० किमी. परिसरातील शेतीचे सिंचन हाेते. याच नदीवर तारणा आणि मांढळ परिसरात प्रत्येकी एक अशा दाेन उपसा सिंचन याेजनांची निर्मिती केल्यास या दाेन्ही गावाच्या परिसरातील किमान तीन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित ६० ते ७० किमी परिसरातील सिंचनाची समस्या सुटू शकते.