शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गाेसेखुर्दच्या ‘बॅक वाॅटर’चा वापर सिंचनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील आमनदीत साचून राहत असल्याने अलीकडच्या काळात या नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा तसेच त्यासाठी तालुक्यात किमान दाेन उपसा सिंचन याेजना मंजूर करून त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील ५४ गावे विस्थापित झाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या जलाशयाच्या ‘बॅक वाॅटर’मुळे वैनगंगा नदीत विलीन हाेणाऱ्या तालुक्यातील सर्व नद्या तुंबतात आणि त्या नद्यांमधील पाणी परिसरात पसरत असल्याने पिकांचे माेठे नुकसान हाेते. यातील आमनदी ही कुही तालुक्यातील प्रमुख नदी असून, या नदीत गाेसेखुर्दचे ‘बॅक वाॅटर’ आणि मकरधाेकडा शिवारातील जलाशयाचे ‘लिकेज वाॅटर’ गाेळा हाेत असल्याने ही नदी वर्षभर तुडूुब भरून असते. मात्र, त्या पाण्याचा सिंचनासाठी काडीचाही उपयाेग हाेत नाही.

आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजनेचे पाणी तालुक्यातील पचखेडीपर्यंत आले आहे. आमनदीवर मांढळ व तारणा येथे उपसा सिंचन याेजना तयार केल्यास मांढळ व तितूर सर्कलमधील शेतीला सिंचनासाठी सहज पाणी उपलब्ध हाेऊ शकते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह ओलिताची रबी पिके घेणे सहज शक्य हाेणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात तसेच शेतमालाच्या उत्पादनात वाढ हाेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही उपसा सिंचन याेजनांना राज्य शासनाने मंजुरी देऊन त्या कार्यान्वित कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे, लीलाधर धनविजय, अर्चना हरडे, विनोद हरडे, संजय निरगुळकर, संगीता निरगुळकर, तुळसीदास कळंबे, मनोज कावळे, बंडू वैद्य, पांडुरंग मेश्राम, निरंजन नागदेवे, मुरलीधर झोडापे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

एकमेव उपसा सिंचन याेजना

कुही तालुक्यातील आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजना ही एकमेव असून, ही याेजना आमनदीवर आहे. या याेजनेमुळे या भागातील २० किमी. परिसरातील शेतीचे सिंचन हाेते. याच नदीवर तारणा आणि मांढळ परिसरात प्रत्येकी एक अशा दाेन उपसा सिंचन याेजनांची निर्मिती केल्यास या दाेन्ही गावाच्या परिसरातील किमान तीन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित ६० ते ७० किमी परिसरातील सिंचनाची समस्या सुटू शकते.