शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

गाेसेखुर्दच्या ‘बॅक वाॅटर’चा वापर सिंचनासाठी व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : गाेसेखुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ तसेच मकरधाेकडा (ता. उमरेड) शिवारातून जलाशयातील ‘लिकेज वाॅटर’ कुही तालुक्यातील आमनदीत साचून राहत असल्याने अलीकडच्या काळात या नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. या पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा तसेच त्यासाठी तालुक्यात किमान दाेन उपसा सिंचन याेजना मंजूर करून त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वैनगंगा नदीवरील गाेसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील ५४ गावे विस्थापित झाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या जलाशयाच्या ‘बॅक वाॅटर’मुळे वैनगंगा नदीत विलीन हाेणाऱ्या तालुक्यातील सर्व नद्या तुंबतात आणि त्या नद्यांमधील पाणी परिसरात पसरत असल्याने पिकांचे माेठे नुकसान हाेते. यातील आमनदी ही कुही तालुक्यातील प्रमुख नदी असून, या नदीत गाेसेखुर्दचे ‘बॅक वाॅटर’ आणि मकरधाेकडा शिवारातील जलाशयाचे ‘लिकेज वाॅटर’ गाेळा हाेत असल्याने ही नदी वर्षभर तुडूुब भरून असते. मात्र, त्या पाण्याचा सिंचनासाठी काडीचाही उपयाेग हाेत नाही.

आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजनेचे पाणी तालुक्यातील पचखेडीपर्यंत आले आहे. आमनदीवर मांढळ व तारणा येथे उपसा सिंचन याेजना तयार केल्यास मांढळ व तितूर सर्कलमधील शेतीला सिंचनासाठी सहज पाणी उपलब्ध हाेऊ शकते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना भाजीपाल्यासह ओलिताची रबी पिके घेणे सहज शक्य हाेणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात तसेच शेतमालाच्या उत्पादनात वाढ हाेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही उपसा सिंचन याेजनांना राज्य शासनाने मंजुरी देऊन त्या कार्यान्वित कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कुकडे, लीलाधर धनविजय, अर्चना हरडे, विनोद हरडे, संजय निरगुळकर, संगीता निरगुळकर, तुळसीदास कळंबे, मनोज कावळे, बंडू वैद्य, पांडुरंग मेश्राम, निरंजन नागदेवे, मुरलीधर झोडापे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

एकमेव उपसा सिंचन याेजना

कुही तालुक्यातील आंभाेरा येथील उपसा सिंचन याेजना ही एकमेव असून, ही याेजना आमनदीवर आहे. या याेजनेमुळे या भागातील २० किमी. परिसरातील शेतीचे सिंचन हाेते. याच नदीवर तारणा आणि मांढळ परिसरात प्रत्येकी एक अशा दाेन उपसा सिंचन याेजनांची निर्मिती केल्यास या दाेन्ही गावाच्या परिसरातील किमान तीन हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित ६० ते ७० किमी परिसरातील सिंचनाची समस्या सुटू शकते.