शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गाेदाम फुल्ल, धान खरेदी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:14 IST

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात पाच ...

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळ व पणन महासंघाच्या माध्यमातून रामटेक तालुक्यात पाच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांवर शेतकऱ्यांकडीत धानाची आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्यात आली. शिवाय, ५० क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल ७०० रुपयाचा बाेनसही जाहीर केला. सध्या या केंद्रांवरील गाेदाम फुल्ल झाले असून, तिथे धानाची पाेती ठेवायला जागा शिल्लक नाही. दुसरीकडे, या काळात आदिवासी विकास महामंडळाने गाेदामांमधील धानाची उचल करणे अपेक्षित असताना, ती केली नाही. त्यामुळे रामटेक तालुक्यातील पाचही केंद्रांवरील धान खरेदी १५ दिवसापूर्वीच बंद करण्यात आल्याने धान उत्पादकांच्या विवंचनेत वाढ झाली आहे. याला आदिवासी विकास महामंडळाचा अनागाेंदी कारभार जबाबदार असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे.

रामटेक तालुक्यातील भंडारबोडी, पवनी व घोटी या तीन आदिवासी विकास महामंडळाने तर बांद्रा व टुयापार येथे पणन महासंघाने स्थानिक संस्थांच्या मदतीने धान खरेदी केंद्र सुरू केले हाेते. या पाचही केंद्रावर शेतकऱ्यांकडील धानाची आधारभूत किमतीनुसार १५ दिवसापूर्वीपर्यंत खरेदी सुरू हाेती. ही सर्व खरेदी केंद्र वेळेवर सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला हाेता.

दरम्यान, पवनी येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यातच भंडारबाेडी येथील खरेदी केंद्र इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांचा राेष व आदिवासी विकास महामंडळाच्या अडचणी वाढल्या. बांद्रा व टुयापार येथील खरेदी केंद्राबाबतही असंताेष निर्माण झाला हाेता. या समस्यांना लाेकमतने वेळावेळी वृत्त प्रकाशित करून वाचा फाेडली हाेती. त्यामुळे घाेटी येथील खरेदी केंद्र हिवराबाजार येथे सुरू करण्यात आले. तालुक्यातील शासकीय धान खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

...

अर्ध्यापेक्षा कमी खरेदी

या पाचही खरेदी केंद्रांनी त्यांच्या मर्जीने त्यांचे भाैगाेलिक अधिकार क्षेत्र वाटून घेतले. आठवडाभराच्या धान खरेदीनंतर हिवराबाजार येथील केंद्राचे गाेदाम फुल्ल झाले. या केंद्रावरील धान खरेदी बंद करण्यात आल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आले. हिवराबाजार येथील खरेदी केंद्र मुद्दाम बंद करण्यात आल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे, एकूण उत्पादनाच्या अर्ध्यापेक्षा अधिक धान अजूनही विक्रीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे.

...

माेजमापात दिरंगाई

या प्रत्येक खरेदी केंद्रावर दिवसाकाठी चार ते पाच शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी अनास्था आणि दिरंगाईमुळे धानाचे माेजमाप करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. त्यातच आता गाेदाम फुल्लची समस्या मानगुटीवर बसली. विशेष म्हणजे शासकीय धान खरेदीचा काळ १ डिसेंबर ते ३१ मार्च हा आहे. राजकीय श्रेय लाटण्यासाठी यावर्षी घाईघाईत खरेदी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. शिवाय, दीड महिन्यापूर्वीच खरेदी बंद करण्यात आली.

...

मिलिंग सुरू झाल्यावर या गाेदामांमधील धानाची उचल केली जाईल. त्यानंतर पुन्हा खरेदी सुरू हाेईल. साेमवारपासून मिलिंग सुरू हाेण्याची शक्यता आहे. राईस मिलर व धानाची उचल करणाऱ्यांसाेबत करार करण्यात आला आहे. मनुष्यबळ आणि गाेदामांची कमतरता असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.

- अविनाश राठाेड, प्रादेशिक व्यवस्थापक,

आदिवासी विकास महामंडळ, भंडारा.