शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

जीवन प्राधिकरणाचे कामकाज ठप्प

By admin | Updated: March 9, 2017 02:30 IST

वेतन आणि निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्वीकारावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे.

कर्मचाऱ्यांचे धरणे : ग्रामीण व डिफेन्सच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो परिणाम नागपूर : वेतन आणि निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्वीकारावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. नागपुरातील तेलंगखेडीजवळील प्राधिकरणाच्या कार्यालयात नागपूर विभागातील ६०० अधिकारी, कर्मचारी ६ मार्चपासून धरण्यावर आहेत. प्राधिकरणाचे कामकाज ठप्प पडल्याने त्याचा परिणाम ग्रामीण व डिफेन्सच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. राज्यातील नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणाचे काम जलदगतीने होण्यासाठी शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची स्थापना केली. परंतु वेळेनुसार शासनाने प्राधिकरणाचे अधिकार काढून घेतले. शासनाने अनुदान देणे बंद केल्यामुळे आणि कमिशनची टक्केवारीदेखील कमी केल्याने प्राधिकरण आर्थिक अडचणीत आले आहे. वेतन, भत्ते, निवृत्ती वेतनाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न प्राधिकरणापुढे ठाकला आहे. राज्यात प्राधिकरणाच्या ५२ पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. नागपूर विभागात डिफेन्स, वाडी, डवलामेटी, चंद्रपूर, गोंदिया येथे प्राधिकरणाच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. तसेच जिल्हा परिषदांमध्येसुद्धा प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पाणीपुरवठा होत असतो. प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात संपूर्ण अधिकारी, कर्मचारी उतरले आहेत. २०१५ मध्येसुद्धा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी असाच संप पुक ारला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. हिवाळी अधिवेशनाच्या काळातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती. परंतु हा प्रश्न गंभीरतेने घेतला नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप कायम राहणार, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने दिला आहे. या आंदोलनात देवेंद्र लांडगे, गजानन गटलेवार, राजेश हाडके, लक्ष्मणराव उपगन्लावार, दीपक धोटे, अनिल इंगोले, प्रशांत दासरवार, विश्वास वानखेडे, प्रकाश बोरकर, मनीष मोहरील, माधवराव लोहे, कल्पना भाके आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)